मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे अशोक सराफ व निवेदिता सराफ. अशोक व निवेदिता वयाच्या या टप्प्यावरही तितक्याच मेहनतीने व उत्साहाने काम करतात. दोघांनाही एकमेकांची साथ आहे. अशोक मामांनाही एखादा पुरस्कार मिळाला की, निवेदिता यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. कित्येकदा हे सगळ्यांनीच प्रत्यक्षात पाहिलं आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर निवेदिता यांनी अशोक यांची साथ दिली आहे. म्हणूनच की काय अशोक मामा पत्नीबाबत अगदी खुलेपणाने बोलतात. आताही एका मुलाखतीत त्यांनी भावुक होत निवेदिता यांच्याबाबत भाष्य केलं. ते बोलत असताना प्रेम म्हणजे नक्की काय? याचा अर्थ नव्याने उमगला. (Ashok Saraf nivedita saraf married life)
अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत अशोक यांनी निवेदिता यांच्याबाबत सांगितलं. ते म्हणाले, “एका वाक्यात मी सांगेन की, ती आहे म्हणून मी आहे. ती नसती तर मी भरकटलो असतो. मला घराकडे बघावच लागत नाही. मी फक्त काम करत राहतो. सगळा घराचा भार तिने घेतला आहे. सगळं घरचं काम ती करते. माझ्या व्यवहारापासून सगळं तिच बघते. माझे फोनही तिच घेते. सगळं म्हणजे सगळं काम तिच करते. मला काही करावंच लागत नाही. ती स्वतः एक अभिनेत्री असूनही हे सगळं करते”.
आणखी वाचा – ‘सैयारा’ पाहून भारती सिंगला अश्रू अनावर, पती हर्ष लिंबाचियाही झाला भावुक, चित्रपटाबाबत म्हणाले…
“अजूनही तिची खूप कामं सुरु आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एक प्रसंग सांगतो. माझी मानेचं दुखणं वाढलं होतं. तेव्हा नेहमी ती रात्र घरी आली की, माझ्या मानेला मलम लावल्याशिवाय ती झोपायची नाही. मग रात्री कितीही वाजता आली तरी ती हे काम करायचीच. माझ्यापेक्षा ती घरी उशीरा येते. मी रात्री ८.३० वाजता वगैरे येतो. पण ती ११ वाजल्याशिवाय घरी पोहोचत नाही. माणूस कसा आहे हे एकदा कळलं ना की, तुमचं नातं अधिक घट्ट होतं. समोरचा माणूस काय आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे”.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ संपणार?, मालिकेच्या कथानकाबद्दल अर्जुन सुभेदार व्यक्त, म्हणाला, “ही कोर्ट केस संपली की…”
“आता मी तिच्यावर सगळं सोडून जातो. फोन करुन फक्त विचारतो. पण तिने सगळं केलेलं असतं. माझ्या आयुष्यात मी बऱ्याच गोष्टी केल्या. पण आयुष्यात सगळ्यात चांगली गोष्ट मी कोणती केली असेल तर ते मी तिच्याशी लग्न केलं. आमची भांडणं पण होतात. पण कुठल्याही भांडणात मी कितीही भडकलो तरी पहिली ती येते. अजून काय पाहिजे”.





