tharala tar mag : ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली अनेक वर्ष रसिक प्रेक्षकवर्गाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिकांच्या मनात घर केलं. सध्या आता मालिकेत रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. येत्या काही दिवसात वात्सल्य आश्रमात जानेवारी 2023 मधील विलासच्या खून प्रकरणाचा निकाल लागणार आहे. यासंदर्भातील अनेक प्रोमो व्हायरल होत आहेत. विलास खुनाचा निकाल लागताच मालिका निरोप घेणार का प्रश्न मालिकेच्या चाहत्यांना सतावू लागला. ही केस अर्जुन सुभेदार आणि दामिनी देशमुख हे दोन्ही वकील सांभाळत आहेत, आणि अखेर ते आमनेसामने आले आहेत.
साक्षी, प्रिया आणि महिपत या त्रिकुटाचा खोटेपणा उघडकीस आणण्यासाठी आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अर्जुन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मालिकेचे आगामी भागांचे प्रोमो पाहून जवळपास हे निश्चित झाले आहे की, निकाल मधुभाऊंच्या बाजूने लागेल. मात्र, यानंतर अशी चर्चा आहे की, Tharala Tar Mag ही मालिका संपणार आहे का?. या प्रश्नाचे उत्तर मालिकेतील कलाकारांनी व्हिडिओद्वारे दिले आहे. अर्जुन सुभेदारसह मालिकेतील प्रताप, चैतन्य तसंच अस्मितानेही TTM संपणार की नाही, याबद्दल स्पष्ट उत्तर दिले.
आणखी वाचा – “लहान मुलाला तरी सोडा”, दिसण्यावरुन देवोलिनाच्या लेकाला ट्रोल करताच चाहते भडकले, म्हणाले, “नीच आणि विचित्र…”
‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला असे कॅप्शन दिले आहे की, “वात्सल्य आश्रम कोर्ट केस संपत असली तरी, इतर मोठे खुलासे होणे बाकी आहेत”. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अर्जुनने असे म्हटले की, “नमस्कार, मी अमित भानुशाली. आज मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे की, बऱ्याच लोकांनी असे विचारले की, कोर्ट केस संपणार आहे तर मालिकाही संपतेय की काय? तर, असं अजिबात नाही आहे. मालिका संपत नाही आहे, फक्त मधुभाऊंची जी केस आहे, ती संपणार. अडीच-पावणे तीन वर्ष लागली या कोर्ट केसला संपायला पण यानंतरही बरंच काही बाकी आहे”.
तो पुढे म्हणाला की, “खरी तन्वी कोण आहे, सायलीच खरी तन्वी आहे का आणि नागराज-महिपत यांच्या केससुद्धा आहेत. त्यामुळे अर्जुन सुभेदार पुन्हा एकदा कोर्टात वकिलाच्या वेशात तुम्हाला दिसेल. त्यामुळे मालिका संपणार असं तुम्ही मनात ठेवू नका. तुमचं इतकं प्रेम आहे, इतकी माया आहे की, शो कधीच संपणार नाही”. अर्जुनच्या या उत्तराने प्रेक्षकांना धीर मिळाला आहे.





