वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहेत. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबियांनीच तिची हत्या केली असल्याचं समोर आलं. याचसंदर्भात पोलिस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान हगवणे कुटुंबियांकडूनच आता वैष्णवीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हगवणे यांच्या वकिलांनी वैष्णवीचे बाहेर दुसऱ्याच व्यक्तीबरोबर संबंध असल्याचं म्हटलं आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आहे. १६ मेला वैष्णवीचा मृत्यू झाला. त्यानंतर हगवणे कुटुंबियांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. छळ, मारहाण यामुळे वैष्णवी त्रस्त होती. मात्र हगवणे कुटुंबियांनी आता स्वतःवरचे आरोप खोटे ठरवण्यासाठी नको नको ते आरोप केले आहे. याचप्रकरणी मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. (Vaishnavi Hagawane Death Case)
वैष्णवी चुकीच्या व्यक्तीबरोबर चॅट करायची. त्या व्यक्तीचा लवकरच साखरपुडाही होणार होता. असे अनेक चीड आणणारे आरोप हगवणेंच्या वकिलांनी केले. हे आरोप ऐकल्यानंतर अनेकांच्या भूवयाच उंचावल्या आहेत. हगवणेंनी यामधून प्रकरणाला वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न केला. वैष्णवी बाबतची एक पोस्ट शेअर करत अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने वकिलांनाच खडेबोल सुनावले आहेत. तसेच या पुरुषी वृत्तीचा तिरस्कार केला आहे.
वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय!
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 28, 2025
हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे…
कठीण आहे! https://t.co/2yV1ASigUQ
हेमंत म्हणाला, “वकिलावरच केस फाइल करण्याची वेळ आली आहे. हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरुषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेही अवमानकारक आहे. कठीण आहे”. हेमंतच्या या पोस्टनंतर अनेकांनी कमेंटद्वारे मत व्यक्त केलं. तसेच प्रकरणाने अचानक घेतलेल्या युटर्नबाबत संताप व्यक्त केला. वकिलांनी आरोप केल्यानंतर वैष्णवी मृत्यूप्रकरणाला कोणतं वळण मिळणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
आणखी वाचा – राणी मुखर्जी व काजोलवर दुःखाचा डोंगर, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन, बॉलिवूडही हळहळलं
अशा वकिलांना भरचौकात चाबकाने फोडून काढलं पाहिजे, या वकिलाची जास्त माहिती नाही पण त्याच्या घरातील स्त्रिया कठीण परिस्थितीत जगत आहेत, वैष्णवीसारख्या महिलांनी आपल्या नवऱ्याला सनकन कानाखाली मारली तरी काहीही बिघडणार नाही अशा अनेक कमेंट हेमंतने केल्या आहेत. वैष्णवीला न्याय मिळावा असं सातत्याने सोशल मीडियावर बोललं जात आहे. तसेच कस्पटे कुटुंबियांनीही लेकीची बाजू मांडत सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.





