Shiva Marathi Serial : मालिकांवर प्रेक्षकवर्ग भरभरुन प्रेम करतात. मालिका म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे असं म्हणणंही आता चुकीचं ठरणार नाही. कलाकार त्यांच्या आवडीनुसार मालिकांना प्राधान्य देतात. अशातच झी मराठी वाहिनीवरील बऱ्याच मालिका आहेत ज्या नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. यापैकी एक म्हणजे शिवा. गेल्यावर्षी फेब्रुवारी २०२४ मध्ये ही मालिका भेटीस आली. गेल्या एका वर्षात या मालिकेने रसिकांच्या मनात घर केलं. मालिकेतील प्रत्येक पात्रही चाहत्यांच्या मनात राज्य करत आहेत. या मालिकेतील शिवा आणि आशु या दोन महत्त्वपूर्ण पात्रांनी आजवर रसिकांची मन जिंकली. याशिवाय इतर पात्रांनीही त्यांच्या भूमिकांनी त्यांचं अस्तित्त्व दाखवून दिलं.
मालिकेतील शिवाने नेहमीच तिच्या करारी स्वभावाने स्वतःला सिद्ध केले. मालिकेत तिचा वावर हा बऱ्यापैकी पाहायला मिळतो. तर तिच्या आजूबाजूच्या दोन पात्रांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवा मालिकेतील शिवाच्या सासूने म्हणजे मीरा वेलणकरने एक्झिट घेतली. यापाठोपाठ आता शिवाचे सासरे समीर पाटील यांनीही मालिका सोडली असल्याचं समोर आलं आहे. मालिकेतून एक नव्हे तर दोन पात्रांनी एक्झिट घेतली असल्याचं समोर येताच चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे.
शिवाच्या सासूबाई म्हणजेच सीताई यांनी मालिकेतून निरोप घेत असल्याचं भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं. तर, आता ही भूमिका यापुढे अभिनेत्री स्नेहा रायकर साकारणार असल्याचं समोर आलं. तर शिवाचे सासरे रामभाऊ यांनी देखील पोस्ट शेअर करत मालिकेतील एक्झिट बाबत सांगितलं. ही भूमिका यापुढे रमेश वाणी साकारणार आहेत. स्नेहा रायकर आणि रमेश वाणी या दिग्गज कलाकारांना यापुढे शिवा मालिकेत पाहणं रंजक ठरणार आहे.
आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा
समीर पाटील यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, “रामचंद्र देसाई उर्फ रामभाऊ. सर्व मित्र-मैत्रिणी आणि रसिक प्रेक्षकांना सांगताना आनंद व दुःख एकत्र होतं आहे कारण, आता यापुढे ‘शिवा’ मालिकेत मी रामभाऊंची भूमिका साकारणार नाही. या भूमिकेला तुम्ही खूप प्रेम दिलं आणि वेळोवेळी तुमचं या भूमिकेवर किती प्रेम आहे हे सुद्धा मला सांगितलं, यासाठी तुम्हा प्रेक्षकांचे खूप-खूप आभार. रामभाऊ या व्यक्तिरेखेला ‘झी मराठी’चा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे याचं समाधान वेगळं आहेच. या प्रवासात खूप मित्र जोडले गेले त्यांचेही आभार. लवकरच नव्या प्रोजेक्टच्या निमित्ताने पुन्हा भेटू”.