सुष्मिता सेनच्या ‘ताली’ वेबसीरिजची ओटीटीवर जोरदार चर्चा रंगली. रवी जाधव दिग्दर्शित या वेबसीरिजला प्रेक्षकांचाही बराच प्रतिसाद मिळाला. सुष्मिताने यामध्ये साकारलेली तृतीयपंथीयाची भूमिका तर कौतुकास्पद आहे. तृतीयपंथी व समाजसेविका गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ही वेबसीरिज आहे. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास या सीरिजच्या माध्यमातून दाखवण्यात आला. तृतीयपंथीयांचं खरं आयुष्य नेमकं कसं असतं? याबाबत गौरी सावंत यांनी भाष्य केलं आहे.
गौरी सावंत यांचं नाव आज समाजामध्ये आदराने घेतलं जातं. त्या एक उत्तम समाजसेविका आहेत. पण त्यांचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. यासाठी त्यांनी अगदी शुन्यापासून सुरुवात केली. इतकंच नव्हे तर मुंबईच्या सिग्नलवर भिकही मागितली. पण तृतीयपंथी भिक मागत असलेल्या पैशांचं नेमकं काय करतात? याबाबत गौरी यांनी खुलासा केला आहे.
आणखी वाचा – मधुराणी प्रभुलकरची लेकही नाटक बसवणार, अभिनेत्रीनेच सांगितला प्लॅन, म्हणाली, “माझ्यापेक्षा माझी मुलगी…”
‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौरी सावंत म्हणाल्या, “मला एखाद्या गुरुची गरज होती. कारण राहण्यासाठी घर पाहिजे. बाहेर मी कितीकाळ राहणार?. जिथे मी राहत होते तिथे गुरु बेडवरती झोपते. चार माझे गुरु भाऊ आहेत ते खाली झोपतात. तिथेच छोटं देवघर आहे. तिथे भिक मागून आणलेल्या पैशांची विभागणी होते. रोजचे ५० रुपये जेवणासाठी द्यावे लागतात”.
आणखी वाचा – Video : एव्हरग्रीन नारकर कपलचा तरुणांना लाजवणारा फिटनेस व्हिडीओ, नेटकरीही करत आहेत कौतुक
“बाकीचे पैसे स्वतःकडे ठेवण्यासाठी सांगितले जातात. तृतीयपंथीयांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी पैसे ठेवा म्हणून सांगितलं जातं. पुरुष असलेल्या व्यक्तीला जर बाई व्हायचं असेल तर लिंग शरीरापासून वेगळं करणं तितकंच गरजेचं आहे. लिंग शरीराबाहेर काढणं म्हणजे केस कापणं नव्हे. त्यासाठीही दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. हा सगळा खर्चही तृतीयपंथीयांना असतो”. गौरी यांनी या मुलाखतीत प्रत्येक विषयांवर अगदी उघडपणे भाष्य केलं.