‘ठरलं तर मग’ मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. एकामागोमाग मालिकेत रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेच्या कथानकाने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अशातच मालिकेत नुकतीच अर्जुनची रियुनियन पार्टी पार पडलेली पाहायला मिळाली. या पार्टीला अर्जुन सायलीलाही बरोबर घेऊन जातो. सगळेजण तिकडे जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. यावेळी सायलीच्या हाती खूप मोठी गोष्ट लागते. सायलीच्या हाती साक्षीचा जुना फोटो लागतो. तो फोटो पाहून सायलीला खूप मोठा धक्का बसतो. (Tharal Tar Mag Promo)
घरी आल्यानंतर सायली तो फोटो अर्जुनच्या हातात देते. तो फोटो पाहून अर्जुनलाही खूप मोठा धक्का बसतो. फोटो पाहिल्यानंतर अर्जुन सायलीला साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड असल्याचं सांगतो. त्यानंतर साक्षीमुळे आपला मित्र कुणाल कायमचा दुरावला असं म्हणत तो दुःखी होतो. आता कुणालसारखी वेळ चैतन्यवर येईल का अशी भीती अर्जुनला वाटते. अर्जुन याबाबत चैतन्यबरोबर बोलण्याचा निर्णय घेतो. अर्जुन चैतन्यला घरी बोलावून घेतो. सुरुवातीला चैतन्य यायला आढेवेढे घेत असतो पण नंतर तो भेटायला यायला तयार होतो.
चैतन्य घरी येतो आणि तो साक्षीला अर्जुनने मला घरी बोलावलं आहे. अर्जुनने चैतन्यला नेमकं का घरी बोलावलं याची चिंता साक्षीला वाटू लागते. त्यामुळे ती मुद्दाम नाटक करत त्याला म्हणते की मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार कारण तू तिथे गेलास की अर्जुन तुझा अपमान करणार आणि हे मला सहन होणार नाही. आता यापुढे आपल्याला दोघांना एकत्र जगायचं आहे त्यामुळे येणाऱ्या संकटांना सुद्धा आपण दोघांनी एकत्रच फेस करायचे. साक्षी आपली इतकी काळजी घेते हे पाहून चैतन्यला बरं वाटतं आणि तो तिला घेऊन जायला तयार होतो.
चैतन्य आल्याचा पाहून अर्जुनला बरं वाटतं पण मागे उभ्या असलेल्या साक्षीला पाहून त्याचा रागाचा पारा चढतो. मी इथे तुला एकट्याला बोलावलं होतं. मग तू तिला इथे का आणलंस. यावर चैतन्य म्हणतो की, साक्षी माझी बायको आहे आणि नवऱ्याची प्रत्येक गोष्ट बायकोला माहिती असलीच पाहिजे. आता या दोघांमध्ये मोठा वाद होईल याची चिंता सायलीला वाटत असते. आता साक्षीबाबत अर्जुन चैतन्यला खरं सांगणार का?, साक्षीचा खरा चेहरा चैतन्यसमोर येणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.