‘पारू’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेच्या कथानकाने या मालिकेला खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. मालिकेत एकामागोमाग एक टर्निंग पॉईंट येताना पाहायला मिळत आहेत. अशातच मालिकेत नुकताच प्रीतम व दिशाचा साखरपुडा समारंभ थाटामाटात पार पडला. प्रीतम व दिशाच्या साखरपुड्यानंतर मालिकेत एक रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. दोघांच्या साखरपुड्यांनंतर किर्लोस्कर कुटुंबियांना एका मोठ्या संकटाला सामोरे जावं लागणार आहे. (paaru serial update)
मालिकेत अहिल्यादेवी यांना त्यांचे गुरुजी संकटाची चाहूल देतात. यावर उपाय म्हणून ते अहिल्यादेवी यांना एक दिवस निर्जल उपवास करण्यास सांगतात. गुरुजींच्या सांगण्यावरुन अहिल्यादेवी निर्जल उपवास करतात. अहिल्यादेवींनी घरावरील संकट दूर करण्यासाठी उपवास केला हे पारूला समजतं. तेव्हा तिच्या देवी आईने उपवास धरला हे समजताच ती स्वतःही उपवास धरण्याचा निर्णय घेते. त्यानंतर किर्लोस्करांकडे दिशाही आलेली असते.
दिशा अहिल्यादेवींनी इंप्रेस करायची एकही संधी सोडत नाही. अहिल्यादेवी उपवास ठेवतात हे समजताच दिशा देखील उपवास ठेवायचा निर्णय घेते. दिशा अहिल्यादेवींजवळ बसून असते. अहिल्यादेवींना दिशाच फार कौतुक वाटतं. त्यानंतर दिशा तिला भूक सहन होतं नाही म्हणून दामिनीच्या रूममध्ये खायला ऑर्डर करते. आणि सगळ्यांची नजर लपवून खायला जाते. त्यावेळी प्रीतम व पारू दिशाला पकडतात. तितक्यात घाईघाईत खात असताना दिशाच्या गळ्यात घास अडकतो. तेव्हा पारू धावत येत तिच्या पाठीवर धपाटा मारते, त्यावेळी घरातील सगळेचजण तिथे येतात.
दिशा सर्वांना बघून खूप घाबरते. दिशाच सत्य सर्वांसमोर आलेलं असतं. तेव्हा ती म्हणते मी माझ्या आयुष्यात कधीच उपवास धरला नाही म्हणून मला आजही उपवास करणं जमलं नाही. यावर अहिल्यादेवी हसतात. त्यानंतर अहिल्यादेवी मंदिरात जात असतात तेव्हा त्यांच्या हातातील काचेची बांगडी फुटते. काचेची बांगडी फुटताच अपशकुन घडतो. त्यानंतर अहिल्यादेवी डोक्यावर हंडा घेऊन मंदिरात जात असतात. त्यावेळी त्यांचा तोल जातो आणि हंडा खाली पडतो. आता हा अपशकुन तरी अहिल्यादेवींचे डोळे उघडणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.