Alia Bhatt Has Opened Up About Motherhood : अलीकडेच आलिया भट्टने पालकत्व, इंटरनेटचे युग, ट्रोलिंग आणि अपयशाची भीती या विषयांवर सद्गुरूंशी भाष्य केलं. यावेळी एका सेशनमध्ये आलिया भट्टने सद्गुरुंना तिची तीन वर्षांची मुलगी राहाबाबत पालकत्त्वाचा सल्ला विचारला. याबाबत भीती व्यक्त करताना, अभिनेत्रीने त्यांना सांगितले की, ‘तिच्या लहान मुलीमध्ये आधीच अपयशाची चिन्हे दिसू लागली आहेत’. आलिया भट्टने सद्गुरूंना पालकत्त्वाबाबत तिच्या मानसिक अस्वस्थतेबद्दल प्रश्न केला. त्यांनी विचारले, “कोणत्याही पालकांना आपण चांगले पालक आहोत की नाही याची काळजी वाटत असेल, तर त्यांच्यासाठी तुमचा एक सल्ला काय असेल?”, या प्रश्नाला अध्यात्मिक नेत्याने उत्तर दिले की, “चिंताग्रस्त पालक चांगले पालक नसतात”.
आलियाने त्यांच्याशी अपयशाच्या भीतीबद्दलही बोलली. त्यांनी सद्गुरूंना सांगितले की तिची मुलगी राहामध्ये देखील लक्षणे दिसू लागली आहेत. ती म्हणाली, “
आपल्या सर्वांना अपयशाची भीती वाटते. माझी मुलगी मोठी होत असताना तिला नेहमी जिंकायचं असतं. दुसरं कोणी आधी आलं तर फसवणूक झाल्याचे ती म्हणते. मी त्याला समजावून सांगते की नाही, तो पहिला आला आहे. पुढे संवाद साधताना आलिया म्हणाली, “मी साडेतीन वर्षांच्या मुलीची आई आहे आणि ती माझ्या आयुष्यातील आनंद आहे. मला प्रत्येक क्षणी काळजी वाटते. एकदा माझ्या वडिलांनी मला विचारले की आई म्हणून कसे वाटते, मी त्यांना सांगितले की आनंद आणि चिंता या संमिश्र भावना होत्या. मला सतत प्रश्न पडतो की मी चांगली आई आहे का?”. याबद्दल सद्गुरुंनी अभिनेत्रीला सावध केले, ते म्हणाले की चिंताग्रस्त पालकांमुळे मुलाचा फायदा होत नाही, उलट जास्त काळजी केल्याने शेवटी मुलाचे नुकसान होते. यासोबतच तिने आलियाला आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलीकडून आयुष्य कसे जगायचे हे शिकण्याचा सल्लाही दिला.
आणखी वाचा – ‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”
आलिया भट्टने सद्गुरूंना मुलांच्या संगोपनाबद्दल विचारले आणि या विषयावर त्यांचा सल्ला घेतला. सद्गुरूंनी विचारले, “तुम्हाला मूल झाल्यावर त्याला काहीही शिकवायचे आहे, हा विचार सोडून द्या. मला माहित आहे की तू एक अद्भुत स्त्री आहेस पण तू आणि तुझी साडेतीन वर्षांची मुलगी यांत जास्त कोण आनंदी आहे?’ यावर आलिया म्हणाली, “राहा”. पालकांनी आयुष्यभर सल्लागाराची भूमिका बजावली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. आलियाला सल्ला देताना, ते म्हणाले की, “तिने फक्त आपल्या मुलीला मोठे होताना पाहत राहावे, कारण शिकवण्यासारखे फार काही नाही कारण प्रौढ लोक आयुष्याला फक्त त्यांच्या दृष्टीकोनातून पाहतात आणि प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करु लागतात”. याविषयी अध्यात्मिक गुरु पुढे बोलले. ते म्हणाले की 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुले सहसा आनंदी असतात, तर प्रौढांना असे नसते. ही बाब स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले, “पूर्वी कोणीतरी तुम्हाला दुःखी करण्यासाठी खूप कष्ट करायचे. आज तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल”
सद्गुरुंनी असेही सांगितले की ते दिवसातून फक्त चार ते साडेचार तास झोपतात. हे ऐकून आलिया आश्चर्यचकित झाली. यावर तिने तिची दिनचर्या शेअर केली आणि सांगितले की ती दिवसातून आठ ते नऊ तास झोपते. हे ऐकून अध्यात्मिक गुरूंनी गंमतीने विचारले, “मग तुम्ही कधी जगणार?”




