प्रिया-उमेश, रितेश- जेनेलिया, अशा अनेक जोड्या सिनेसृष्टीत चर्चेत आहेत. त्यांच्या कडे आदर्श जोड्या म्हणून पाहिलं जात.परंतु या सर्व जोड्यांमध्ये एव्हरग्रीन असणारी जोडी म्हणजे अशोक मामा आणि निवेदिता ताई. पडद्यावर आणि पडद्यामागे या जोडीवर प्रेक्षक कायम भरभरून प्रेम करतात. इतका वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभव गाठीशी असल्यामुळे एक वेगळं सामंजस्य त्यांच्या नात्यात पाहायला मिळते. (Nivedita Ashok Saraf Love Story)
लग्न, संसार, जोडीदार म्हंटल की अनेक अपेक्षा नकाळतपणेच नात्यात येऊन जातात.एकमेकांच्या मतांचा आदर करणं, वैयक्तिक निर्णय स्वीकारणं. एकमेकांच्या पाठीशी उभं रहाणं, धडपडल्यावर सावरणं, या आणि अशा अनेक गोष्टी असतात. आणि या गोष्टींचा समतोल राखण्यावरच कोणत्या ही नात्याचं यश अवलंबून असत.अशोक मामांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभवांबद्दल बऱ्याचदा सांगितलं आहे. असाच एक निवेदिता ताईनं सोबतचा अनुभव त्यांनी सांगितला आहे.
पाहा काय म्हणाले अशोक मामा ? (Nivedita Ashok Saraf Love Story)
अशोक मामा म्हणतात, त्यांना एखादा निर्णय घ्यायचा असला तर निवेदिताला विचारल्याशिवाय ते तो घेत नाहीत. कपडे काय घालावेत.इथपासून स्क्रिप्ट स्वीकारावं का इथपर्यंत. त्यांना एखादं स्क्रिप्ट चांगलं किंवा वाईट वाटलं तरी ते त्याबद्दल निवेदितांशी बोलतात चर्चा करतात.त्यामुळे त्यांच्या मनातल्या निर्णयाला बळकटी येते.
निवेदिता मात्र एखादा निर्णय घेतला की, आपण अमुक एक गोष्ट करायचं ठरवलंय, असं सांगतात.अशोक मी असं करतेय हं. करू का ? असं त्यांनी आज पर्यंत कधीही विचारलेलं नाही. एकाच क्षेत्रात काम करत असताना हे सामंजस्य फार कमी पाहायला मिळते. (Nivedita Ashok Saraf Love Story)
हे देखील वाचा : शेफ असूनही निवेदिता यांच्या मुलाला – आवडतो आईच्या हातचा ‘तो’ पदार्थ
पुरुषप्रधान संस्कृती मध्ये बायकोने नवऱ्याच्या परवानगीशिवाय काही करणं म्हणजे उथळपणाचं मानलं जात. म्हणूनच अशोक मामा आणि निवेदिता ताईंकडून कामाव्यतिरिक्त आयुष्यातल्या या गोष्टी देखील शिकणायसारख्या आहेत.एकमेकांच्या स्वभावाचा स्वीकार करणं हे कोणत्याही नात्यात फार महत्वाची गोष्ट आहे.