‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील राज-कावेरीच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. ४ एप्रिल २०२२ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. अशातच आता या मालिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रेक्षकांची ही लाडकी मालिका आता निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. लवकरच ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका ऑफ एअर जाणार असल्याचं समोर आलं. (Colors Marathi Serial)
नुकतंच या मालिकेच्या व्रॅपअप पार्टीचे खास फोटोही समोर आले. “खूप सुंदर टीम आणि छान माणसं या लोकांबरोबर काम करून खूप समाधान मिळालं. ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेच्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन…थँक्यू मला पियू ही भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल” अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने मालिकेची संपूर्ण टीम, तन्वी, विवेक, निवेदिता सराफ यांचे आभार मानले. शूटिंगच्या शेवटच्या क्षणी सगळेच कलाकार भावुक झालेले पाहायला मिळाले.
मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी व्रपअप पार्टी आयोजित करण्यात आली. यावेळी कलाकारांनी केक कट करत फोटो,व्हिडीओ काढले. प्रेक्षकांची ही आवडती मालिका ऑफ एअर जाणार असल्याचं समजताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सध्या नवनवीन मालिका येत असल्याचं समोर आलं आहे. नवीन मालिका आल्याने आता जुन्या मालिकेला वाहिनीने राम राम केला आहे. ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’, ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’, या मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झाल्या आहेत.
स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ ही मालिका २२ एप्रिलपासून सुरु होणार असून या मालिकेला रात्री ९ वाजताची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे रात्री ९ वाजता लागणाऱ्या ‘रमा राघव’ या मालिकेची वेळ बदलून रात्री ९.३० वाजताची केली आहे. तर आता दररोज ९.३० वाजता प्रसारित होणारी ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.