‘झी मराठी’वरील ‘पारू’ या मालिकेत खूप मोठं रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवींचा जीव वाचवून पारूने स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो. पारूला चक्कर येताच तिला तात्काळ हॉस्पिटलला घेऊन जातात. तेव्हा तिथे गेल्यावर कळतं की, तिची प्रकृती गंभीर आहे. त्यानंतर डॉक्टर सर्वांना सांगतात की, कमीत कमी सहा तास आहेत तेवढ्या वेळात रुग्णाला बॉम्बे ब्लड ग्रुप हा मिळायलाच हवा. पेशंटला रक्ताची फारच आवश्यकता आहे. नाहीतर पेशंट कोमामध्ये जाईल. (Paaru Serial Update)
आदित्य प्रीतम तो ब्लडग्रुप मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न करतात मात्र पारूचा ब्लड ग्रुप हा कुठेच उपलब्ध नसतो. त्यानंतर आदित्यचे वडील तिथे आलेले असतात त्यांना ही गोष्ट कळते तेव्हा ते म्हणतात की अहिल्याचा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. आपल्याला अहिल्याला पारूचा जीव वाचविण्यासाठी इथे आणायलाच लागेल, असं म्हणून ते निघून जातात. तितक्यात दामिनी दिशाला फोन करून सांगते की, पारूला रक्ताची गरज आहे म्हणून भावोजी अहिल्या वहिनींना आणायला निघाले आहेत. अहिल्या वहिनींचा आणि पारूचा ब्लड ग्रुप एकच आहे हे ऐकल्यावर दिशा प्लॅन करते आणि डॉक्टरांनी दिलेल्या झोपेच्या गोळ्या दुधात घालून अहिल्यादेवींना देते त्याने अहिल्यादेवींना झोप लागते.
अहिल्यादेवी काही केल्या उठतच नाहीत हे पाहून ते आदित्यला ही गोष्ट सांगतात. तेव्हा आदित्यही काळजीत सांगतो की, तुम्ही तिला उठवायचा प्रयत्न करा. मात्र अहिल्यादेवी काही केल्या उठत नाही कारण त्या गाढ झोपलेल्या असतात. त्यानंतर दामिनी व दिशा पुन्हा एकदा एकमेकींना फोन करतात आणि दामिनी दिशाचं कौतुक करते की, तू ही बाजी कशी मारलीस?, तुला सगळं कसं अचूक जमतं. यावर दिशा दामिनीची अक्कल काढत तिला ऐकवून दाखवते. पारूचा जीव धोक्यात आहे, जर ब्लड मिळालं नाही तर ती मरू शकते हे ऐकल्यावर दिशाला खूप आनंद होतो. दिशादेखील मला सुद्धा ही गुडन्यूज ऐकायची खूप उत्सुकता लागून राहिली आहे, असं सांगते.
आता काही अहिल्यादेवी उद्या सकाळपर्यंत उठत नसते असं बोलून दिशा फोन ठेवणार इतक्यात दामिनी दिशाला म्हणते की आदित्य वाटतं वहिनींना आणायला घरी गेला आहे. तेव्हा दिशा ते फार मनावर घेत नाही आणि म्हणते की, आता कोणी आलं तरी सासू मॉम उठणार नाहीत, हे बोलत असतानाच पाठीमागे आदित्य येऊन उभा असतो. आता आदित्यने दिशाचं सगळं बोलणं ऐकलेलं असेल का?, दिशाचा डाव पलटणार का?, पारूला अहिल्यादेवी रक्त द्यायला पोहोचणार का?, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.