सिनेसृष्टीतील कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच आपल्या ऐकण्यात येतात. यामध्ये आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश व संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. इतकेच नव्हे, तर हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. पण अभिनेत्रीने या चर्चांवर मौन सोडत मोठा खुलासा केला आहे. (Music Director Anirudh and Actress Keerthy Suresh Wedding)
अभिनेत्री किर्ती सुरेश दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणली जाते. तर, संगीतकार अनिरुद्धदेखील दक्षिणेतील मोठा चेहरा असून बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध किर्ती सुरेशला डेट करत असून हे दोघे लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे.
हे देखील वाचा – “आमच्या पप्पांनी गणपती आणला…” या ट्रेंडिंग गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स, ठेका धरत म्हणाले, “आमच्या झीनं..”
मात्र, अभिनेत्रीने एका माध्यमाशी संवाद साधताना या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ती म्हणाली की, “ही बातमी पूर्णपणे चुकीची असून अनिरुद्ध माझा चांगला मित्र आहे.” तर या लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीचे वडील सुरेश कुमार यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. या बातम्या पूर्णपणे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा – “कुणी कुणासाठी रडत बसत नाही म्हणून…”, नाना पाटेकरांचं मृत्यूबाबत धक्कादायक विधान, म्हणाले, “स्मशानभूमीत लागणारी लाकडं मी…”
दरम्यान, अभिनेत्री किर्ती सुरेश काही दिवसांपूर्वी ‘जवान’चा दिग्दर्शक ॲटलीची पत्नी प्रियासह चित्रपटातील ‘चलेया’ गाण्यावर थिरकली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनिरुद्ध व किर्ती यांनी ‘रेमो’, ‘थाना सेरंधा कूटम’, ‘अग्न्यथावासी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून दोघं एकमेकांचे जवळचे मित्र आहे.