‘बिग बॉस १७’ हा शो गेले अनेक दिवस चर्चेत आहे. शोमध्ये येणारे नवीन स्पर्धक या शोला आणखीनच रंजक बनवत आहेत. या शोमध्ये येणारे नवीन ट्विस्ट हा या शोचे आकर्षण ठरत आहे. अशातच आता या शोमध्ये नुकतीच आयेशा खानची एण्ट्री झाली आहे. तिच्या एण्ट्रीने या घरातील समीकरणेच बदलली असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी मुन्नवरने आयेशाबरोबर लग्नाच्या शक्यतेवर संवाद साधताना दिसला. यावेळी मुन्नवरने आयेशाला मुनवरने आयेशाल तिच्याबरोबर लग्न करण्याच्या शक्यतेबद्दल विचारले.
मुन्नवरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये मुन्नवर आयेशाबरोबर लग्नाबद्दल चर्चा करताना दिसत आहे. यावेळी तो तिला असं विचारतो की, “आपण दोघांनी जर आपल्यातले प्रश्न सोडवले आणि भविष्यात आपल्यात काही चांगले घडणार असेल तर तुझे कुटुंब मला स्वीकारेल का?” मुनव्वरचे हे शब्द ऐकून आयेशा खुश होते आणि त्याला विचारते की, “तुला खरच आपल्यातल्या गोष्टी सुधारायच्या आहेत का?” यावर मुन्नवर उत्तर देत असे म्हणतो की, “माझी मनापासून इच्छा आहे.”
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत मुन्नवरवर नाराजी व्यक्त केली आहे. “मुन्नवर तु इतक्या लवकर नाझिलाला कसं विसरू शकतोस?, आयेशा जेव्हा वाईल्ड कार्ड म्हणून आली तेव्हा तो म्हणत होता की तो नाझिलाला खूप मिस करत आहे आणि आयेशाबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त करत आहे?, हे खूपच चुकीचे आहे. मुन्नवर तु आमच्या मनातून उतरत आहेस” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी व नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आयेशाने घरात एण्ट्री करताच तीने मुन्नवरचा बदला घेणार असल्याचे म्हटले होते. आयेशा मुन्नवरचा पर्दाफाश करणार असल्याचे बोलली होती. तर मुन्नवरदेखील त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला नाझिलाची आठवण येत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र आता दोघांमधील संघर्ष कमी होऊन त्यांच्यात प्रेम फुलत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी भागात काय पहायला मिळणार याचे अनेकजण वाट पाहत आहेत.