बिग बॉस १३’ मधून अभिनेत्री रश्मी देसाई हिने विशेष लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरातील सिद्धार्थबरोबरची भांडणे असोत किंवा ‘बिग बॉस’च्या घरात तिचा प्रियकर अरहान खानबरोबरच्या ब्रेकअपच्या अफवा असो, शोच्या प्रसिद्धीसाठी ती नेहमीच जबाबदार ठरली आहे. आसाममधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात रश्मीचा जन्म झाला. तिचे आई-वडील गुजरात येथील आहेत. अभिनेत्रीचे शालेय शिक्षण उलुबारी हायस्कूल व आसाम जेबी खोत हायस्कूलमधून झाले. (Rashami Desai Casting Couch)
रश्मीचे खरे नाव दिव्या देसाई होते. इंडस्ट्रीत आल्यानंतर तिने तिचं नांव बदलले. रश्मीने याआधी भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अनेक बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती ‘बलमा बडा नादान’, ‘ये लम्हे जुदाई के’, ‘गजब भैल रामा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. याशिवाय रश्मी मणिपुरी, आसामी व बंगाली चित्रपटांमध्येही दिसली.
रश्मी देसाई भरतनाट्यम व कथ्थकमधील प्रशिक्षित नृत्यांगना आहे. २०१५ मध्ये ‘नच बलिए’ या शोमध्ये ती व तिचा माजी पती नंदिश संधू यांनीही भाग घेतला होता. रश्मीच्या वडिलांचं बऱ्याच पूर्वी निधन झालं आहे. त्यानंतर अभिनेत्रीला तिच्या आईने वाढवले. रश्मीला एक लहान भाऊ देखील आहे, जो विवाहित आहे. सिनेसृष्टीत आल्यानंतर रश्मी कास्टिंग काउचची शिकार झाली होती. याबाबत तिने ‘पिंकविला’ला सांगितले होते की, “माझी आई सिंगल पॅरेंट होती. आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. आईने जे काही कमवायची त्यावरुन आमचे घर चालायचे. दोन वेळच्या जेवणासाठीही आमच्याकडे पैसे नव्हते. मी वयाच्या १६व्या वर्षी कमवायला सुरुवात केली” असं ती म्हणाली. रश्मीने एकदा विष घेतलं होत, मात्र, ती तिची चूक होती, असं तिचं मत असल्याचंही तिने सांगितलं.
कास्टिंग काऊचबद्दल बोलताना ती म्हणाली होती की, जेव्हा ती ऑडिशनसाठी गेली होती तेव्हा तिच्या ड्रिंकमध्ये मादक पदार्थ मिसळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण दुसऱ्या दिवशी तिच्या आईने त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली होती.