सध्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. अभिनेता रणबीर कपूरचा हा चित्रपट जगभरात बराच गाजतान दिसत आहे. या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्यांची म्हणजे उपेंद्र लिमये यांची सगळ्यांच विशेष लक्ष वेधत आहे. मध्यांतरापूर्वी त्यांचा छोटासा सीन प्रेक्षकांना टाळ्या व शिट्ट्या वाजवायला भाग पाडतो. या कलाकाराने आजवर बऱ्याच दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे. अगदी ‘सरकरा राज’ चित्रपटामध्ये ही त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं आहे. पण उपेंद्र यांच्याबरोबर काम करताना इतर कलाकार घाबरताना दिसतात. पण ते कलाकार का घाबरतात याचा उलघडा त्यांनी नुकताच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात केला. (Upendra limaye talk about why are people afraid of them)
तुम्ही काहीही न करता लोक तुम्हाला का घाबरतात? या प्रश्नावर उत्तर देत उपेंद्र यांनी उलगडा केला की, “माझ्याबाबतीत असं कायम होत असतं. पत्रकारांचंच नाही तर सामान्य माणसही मला घाबरतात. अगदी नवीन कलाकारांचंही बऱ्याचदा असं होतं. मग त्यावर उपाय म्हणून मी त्यांच्याबरोबर खूप मैत्रीपूर्वक बोलतो. पण कसं आहे ते मैत्रीपूर्वक वातावरण निर्माण व्हायला हवं. कादाचित माझं व्यक्तिमत्त्व तसं असेल म्हणून किंवा मला मिळालेला भारदस्त आवाज त्यामुळे लोक मला घाबरत असतील. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की माझ्यापासून चार हात लांबच राहावं. पण लोक असा विचार करणं स्वभाविक आहे. त्याला मी काही करु शकत नाही. पण मग मी त्यांना कधीतरी म्हणतो, की तुम्ही माझ्याबरोबर राहून बघा. मग तुम्हाला कळेल की मी किती प्रेमळ आहे”, असं सांगत त्यांनी सगळे का घाबरतात याचा उलघडा केला.
उपेंद्र पुढे सांगतात, “काम करत असताना कलाकारांना दडपण आलं असेल तर मग पुढे गडबड होऊ शकते. म्हणून मग माझा स्वतःचा असा प्रयत्न असतो की कोण नविन असेल. विशेषतः जर ती मुलगी असेल कारण मुली जरा जास्तच घाबरतात. त्यामुळे मी पहिल्यापासून त्यांना असं म्हणतो की, तो जो काही सीन आहे तो शंभर मीटर पळण्याची स्पर्धा नाही. मी तुमच्यात किती भारी काम करून दाखवतो हे महत्त्वाचं नाही”,
उपेंद्र पुढे अभिनयाबाबत स्पष्ट करतात, “केमिस्ट्री जुळून आली तर सीन छान होणार आणि तरच तो सीन लोकांना आवडणार. त्यामुळे मला केमिस्ट्री जुळून येण्यासाठी मग अभिनय करताना थोडा खेळकरपणा, मजेशीरपणा तसेच धमाल करावी लागते. त्यामुळे तो मोकळेपणा आला तरच कलाकार छान मोकळेपणाने अभिनय करु शकतो”, असं सांगत त्यांनी कलाकारांबरोबर त्यांचा वावर कसा असतो हे सांगितलं.