बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिला भाजपकडून उमेदवारी मिळाली होती. हिमाचल प्रदेशमधील मंडी या भागातून ही उमेदवारी तिला मिळाली होती. त्यानंतर मोठ्या जोमात ती प्रचाराच्या कामासाठी लागली होती. अशातच आता तिचे अजून एक वक्तव्य खूप चर्चेत आले आहे. तिने प्रचारादरम्यान अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते जे आता खूप चर्चेत आले आहे. (kangana ranaut on bollywood)
लोकसभा तिकीट मिळाल्यानंतर कंगना मंडी येथे अनेक भागांमध्ये भाषण करताना दिसली. यावेळी तिने निवडणुकांमध्ये यश मिळाल्यास मनोरंजन क्षेत्र सोडू शकते असेदेखील ती म्हणाली होती. याबद्दल ती माध्यमांशी बोलताना व्यक्त झाली आहे. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, “मला चित्रपटांमध्ये कंटाळा येतो. मी भूमिका करते, मी दिग्दर्शनदेखील करते. जर मला राजकारणात यश आले आले तर किंवा लोक माझ्याशी जोडले गेले तर मी राजकारणात सक्रिय राहीन. मला कोणतंतरी एकच काम करायला आवडेल. जर मला वाटलं की लोकांना माझी गरज असेल तर मी त्याप्रमाणे काम करेन. मी जर मंडीतून जिंकून आले तर मी राजकारणात कायमस्वरूपी राहीन. मला अनेक चित्रपट निर्माते राजकारणात न जाण्याचेही सल्ले देतात”.
पुढे ती म्हणाली की, “मी राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल कुठेही गेले तरीही लोकांकडून खूप प्रेम मिळते. मनोरंजन चित्रपटसृष्टीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यानंतर जर कोणाला सन्मान मिळत असेल तर ती व्यक्ती मी आहे”.
कंगना सध्या भाजपच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशातील मंडीमधून लोकसभा निवडणुकांमध्ये सहभागी होत आहे. यासाठी ती पूर्णपणे तयारीत आहे. तसेच तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपत प्रदर्शित होणार आहे. १४ जून २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.