आई कुठे काय करते या मालिकेत वेगवेगळ्या टप्यावर अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात. म्हणून या मालिकेचा चाहता वर्ग मोठा आहे.या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. आपल्या अभिनयातील सहजतेने त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. या मालिकेत सध्या अनेक वळण आहेत. इशाच्या आयुष्यात एक वेगळाच गोंधळ सुरु आहे. तर त्यांच्या कुटुंबावर एकापाठोपाठ संकट येतच आहेत. (Abhishek Accident)
पाहा नक्की काय घडलं ? (Abhishek Accident)
पुढील भागात देशमुख कुटुंब मोठ्या संकटात सापडणार असल्याच पहायला मिळणार आहे.अभी गोळ्या घेऊन झोपलेला असतो. अनघा त्याला झोपेतून उठवत असते.ती त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु तो उठतच नाही. अनघा घाबरते आणि अरुंधतीला फोन करते. त्या वेळी अरुंधती आणि आशुतोष किचन मध्ये काही तरी काम करत असतात. अरुंधती अनघाचा फोन उचलते. तेव्हा अनघा घाबरलेल्या अवस्थेत सांगते की अभि उठत नाही आहे. अरुंधती सुरवातीला गडबडते तिला अनघाच म्हणणं कळत नाही त्यावर अनघा तिला घडलेला प्रकार सांगते. अरुंधती तेव्हा काळजीत पडते. (Abhishek Accident)
हे देखील वाचा : हिंमत दाखवणं हा एकच पर्याय – असा शूट केला गौरीने सिन
अभिला नक्की काय झालं आहे? अभिचा जीव धोक्यात आहे का ? आता कोणत्या नवीन संकटाला अरुंधती आणि कुटुंबाला समोर जावं लागणार आहे हे विचारात पाडण्या सारखं आहे. कालच्या भागात अरुंधती आणि आशुतोष हनिमूनला जाण्याचा विचार करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला इशा थाटामाटात साखरपुडा हवा म्हणून घरच्यांकडे हट्ट घेऊन बसली आहे. त्याच वेळी अभि जखमी अवस्थेत घरी येतो त्याचा अपघात झालेला असतो.त्यावेळी अनघा त्याची खूप काळजी घेते.त्यामुळे त्यांच्या नात्यातला दुरावा मिटून पुन्हा त्यांचं नातं पूर्ववत होण्याची एक आशा होती. (Abhishek Accident)