‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, अर्जुन पूर्णा आई व रविराज यांना समजावल्याबद्दल आणि एकूणच परिस्थिती अगदी उत्तम हाताळल्याबद्दल सायलीचे आभार व्यक्त करते. तू पुढे ज्या कुणाशी लग्न करशील त्यांना पण आनंदी ठेवशील असंही अर्जून सायलीला सांगतो. त्यावर सायली मी इतर कुणाशी लग्न न करता सुभेदारांचीच सून होण्याचे मनातल्या मनात म्हणते. इतक्यात प्रतिमाच्या फोटोजवळची फुलं अर्जुन-सायलीजवळ पडतात. दुसरीकडे नागराज व तन्वी प्रतिमा, सायली या विषयाला प्रचंड कंटाळतात. (Tharal Tar Mag Serial Update)
नागराज तन्वीला म्हणजेच प्रियावर न चिडता प्रतिमा प्रकरण दोघांनी संपवल्यामुळे सेलिब्रेट करायचं सांगतो. नागराज निघून जाताच तन्वी प्रतिमाचा असुरी आनंद हसून व्यक्त करते. रात्री उशिरा तन्वी म्हणजेच प्रियाला नर्सचा दहा लाख रुपयांच्या मागणीसाठी फोन येतो. तन्वी नर्सला फेक रिपोर्टचे इतके पैसे कसे झाले असं विचारते. सायली तिच्या खोलीबाहेरुन जात असताना हे बोलणं ऐकते. दुसऱ्या दिवशी रविराज व सगळ्यांसमोर प्रियाला रात्रीच्या आलेल्या फोनबद्दल सायली विचारणा करते, इतकंच नाही तर प्रिया काय बोलली हे प्रत्येक वाक्य सायली सांगते. त्यावर प्रिया साफ नकार देते आणि अस्मितासुद्धा तिचीच बाजू घेते. अखेर प्रिया स्वतःला लो शुगरचा त्रास जाणवल्याने आणि तुम्हाला ते कळू नये यासाठी नॉर्मल रिपोर्ट बनवायला सांगितल्याचे रविराजला खोटं सांगते. त्यावर पूर्णा आईसुद्धा असं कशाला करायचं असं तिला समजावते. नागराज मात्र प्रियाची बाजू सावरायचा प्रयत्न करतो. तरीही सायलीला मात्र आदल्या रात्रीबद्दल प्रियाचा संशय येतोच. पूर्णा आईला अर्जुन घरी जाण्याबद्दल विचारताच पूर्णा आई माझ्या प्रतिमाच्या घरातून पाय निघत नसल्याचे सांगते.
प्रिया लगेच प्रतिमाबद्दल रडून नाटक करुन दाखवते. इतक्यात सायली फुलं घेऊन प्रतिमाच्या फोटोपाशी येऊन प्रतिमाशी बोलू लागते आणि रविराज तसेच पूर्णा आईशी काहीतरी बोलायचं असल्याचं पण सांगते. पूर्णा आई आणि रविराज यांना तुमच्या चेहऱ्यावर प्रतिमाला कायम हसू बघायचं आहे, असं सायली सांगते. इतक्यात प्रतिमापुढचा दिवा जातो आणि फुलंसुद्धा पडतात. त्यावरुन रविराज पूर्णाआईला जे सायली सांगते तेच प्रतिमाचं म्हणणं असल्याचं सांगतो. सायली व अर्जुन पूर्णा आईला घेऊन रविराजच्या घरून निघतात. इथे अश्विन व कल्पनाला साक्षीची प्रेस कॉन्फरेन्स पाहून धक्का बसतो.
मालिकेच्या पुढील भागात पाहणार आहोत की, अर्जुन- चैतन्य व सायली यांना साक्षीने घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सने जबर धक्का बसतो. साक्षीची फसवणूक करत प्रेस घेतल्याची बातमी चैतन्य- अर्जुनसमोर येते. आता अर्जुनही साक्षीचा खरा चेहरा प्रेससमोर आणणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.