‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणाने आता साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. चैतन्यने सुभेदारांच्या घरी येऊन केलेल्या खुलास्याने साऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तर अर्जुन व सायलीला चैतन्यने सांगितलेली बातमी ऐकून खूप मोठा धक्का बसला आहे. मालिकेत सायली व अर्जुन यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत असताना यांत मिठाचा खडा पडला असल्याचं समोर आल्याने मालिकेत एक रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. अर्जुनला बरे वाटावे म्हणून सायली १५ मिनिटांच्या डेटवर घेऊन जाते. त्यांचं प्रेमाचं नातं बहरत असतानाचं मालिकेत ट्विस्ट आलेला आहे. (Tharal Tar Mag Serial Update)
चैतन्यने सुभेदारांकडे येऊन खूप मोठा धक्का दिलेला आहे. चैतन्य सुभेदारांकडे येत म्हणतो की, “प्रताप काका, कल्पना मावशी, पूर्णा आजी मला जेव्हापासून आठवत आहे तेव्हापासून तुम्हीच माझे कुटुंब आहात. मी माझ्या आयुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे आणि तो प्रवास तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. मी आणि साक्षी साखरपुडा करणार आहोत”. चैतन्यने हा खुलासा करताच अर्जुन-सायलीसह संपूर्ण सुभेदार कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते.
याआधी अर्जुन-सायलीने अनेकदा चैतन्यला साक्षीपासून दूर राहण्याचा सल्ला दिलेला असतो, मात्र चैतन्य कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. साक्षीच्या प्रेमात तो पूर्णपणे आंधळा झाल्याने तो कोणाचेही काहीच ऐकून घेत नाही. अर्जुन-सायलीला साक्षीविरोधात पुरावा सापडतो की ती कुणालची गर्लफ्रेंड होती आणि तिच्यामुळेच त्याने आत्महत्या केली. हा पुरावा ही गोष्ट अर्जुन चैतन्यला सांगण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे सत्य चैतन्यपर्यंत पोहोचत नाही. आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होतं.
आता चैतन्य साक्षीने आखलेल्या या ट्रॅपमध्ये फसणार का?, तो साक्षीबरोबर साखरपुडा करणार का?, विलास खुनाच्या केसमध्ये साक्षीचा हात असल्याचं समोर येईल का?, की अर्जुन चैतन्यची साक्षीपासून सुटका करेल?, हे सर्व मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरेल.