‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत रंजक वळण येत असून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या अहिल्यादेवींचं व्रत सुरू असलेल पाहायला मिळालं. अहिल्यादेवींचं हे व्रत पारूमुळे पूर्ण झाले असल्याचंही सर्वांसमोर आलं. व्रत पूर्ण करत असताना पाण्याचे २१ हंडे त्यांना नदी काठापासून मंदिरापर्यंत घेऊन जायचे असतात यावेळीच मधल्या एका फेरीत अहिल्यादेवींच्या हाताला साप चावतो. त्यावेळेला पारू तिथे असते. (Paaru Serial Update)
पारू खूपच घाबरलेली असते, तिच्या देवी आईला काही होऊ नये म्हणून पारू स्वतःच्या तोंडाने अहिल्यादेवींना साप चावलेल्या जागी तोंडातून सगळं विष काढून बाहेर फेकून देते आणि त्यानंतर अखेर अहिल्यादेवी त्यांचे व्रत पूर्ण करू शकतात. मात्र इकडे पारूचा जीव धोक्यात आलेला असतो. अहिल्यादेवी जेव्हा तिला प्रसाद द्यायला जातात तेव्हा पारूला चक्कर येते. त्यानंतर लगेचच आदित्य, प्रीतम व मारुती पारुला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात असतात. हॉस्पिटलमध्ये जाताना पारू डोळे बंद करून घेते. त्यामुळे आदित्य, प्रीतम मारुती यांचं टेन्शन आणखी वाढतं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर पारूची कंडीशन ही क्रिटिकल असल्याचं सांगतात. त्यानंतर लगेचच तिला आयसीयूमध्ये दाखल केलं जात.
मालिकेत पुढे असं पाहायला मिळाले की इकडे अहिल्यादेवींना सुद्धा डॉक्टर तपासायला आलेले असतात. त्या उपचार घेत असतात तर त्यांना काळजी घेण्याची आवश्यकता असते असं सांगण्यात येतं. तर इकडे पारूच्या जीवाला धोका असतो असं डॉक्टर सांगतात. तिला लवकरात लवकर रक्ताची गरज लागेल आणि तिचा जो ब्लड ग्रुप आहे ते रक्त आता तरी इथे कुठेच नाही आहे. आणि रक्त मिळालं नाहीतर पारू कोमामध्ये जाईल असंही ते सांगतात. त्यानंतर आदित्य डॉक्टरांना विचारतो की, रक्त जमा करायला असा कमीत कमी आपल्याजवळ किती वेळ आहे?, हे ऐकल्यावर डॉक्टर म्हणतात, फक्त सहा तास. सहा तासाच्या आत रुग्णासाठी आपल्याला हे रक्त उपलब्ध करून द्यावेच लागेल.
पारूच्या रक्ताचा बॉम्बे ब्लड ग्रुप हा फार विरळ असल्याने आता आदित्य प्रीतम समोर खूप मोठं संकट येऊन उभं राहिलं आहे. तर इकडे अहिल्यादेवींना झोप येण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या झोपेच्या गोळ्या दिशा मोठ्या प्रमाणात घेऊन त्या अहिल्यादेवींच्या दुधात मिक्स करते. आता ते दूध अहिल्यादेवी पिणार का?, सहा तासाच्या आत आदित्य व प्रीतम या ब्लड ग्रुपचं रक्त आणून देणार का?, पारूचा जीव वाचणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.