‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, चैतन्य व अर्जुन यांच्यातील वाद मिटलेला असतो आणि त्यानंतर चैतन्य अर्जुनला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला आलेला असतो. त्यावेळेला खूप दिवसांनी आल्यामुळे चैतन्यला खूपच आनंदी वाटत असतं तर अर्जुनही चैतन्यला मिस करत असतो. त्यानंतर अर्जुन चैतन्यला सांगतो की, मला तुला काहीतरी गोष्ट सांगायची आहे, असं म्हणत तो सायली वर त्याचं किती प्रेम आहे आणि सायलीच्या तो प्रेमात पडला असल्याचं चैतन्यसमोर कबूल करतो. (Tharal Tar Mag Serial Update)
तेवढ्यात चैतन्यच्या लक्षात येत की, आपण तर रागाच्या भरात सायली व अर्जुनच्या या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल साक्षीला सांगून बसलोय. आता जर मी हे अर्जुनला सांगितलं तर त्याचा पुन्हा विश्वासघात होईल असं म्हणून तो विचार करू लागतो. तर इकडे साक्षी प्रियाला सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सगळं काही खरं सांगते. ते ऐकून प्रियाचा आनंद गगनात मावेनासा होतो. तिला सुरुवातीला विश्वासच बसत नसतो मात्र नंतर ती विश्वास ठेवते आणि सांगते की, आत्ताच्या आत्ता मी जाऊन हे सगळं काही योग्य अशा व्यक्तीला सांगते असं म्हणत ती सुभेदारांच्या घरी निघते.
तर इकडे साक्षी व चैतन्य जेव्हा भेटतात तेव्हा चैतन्य साक्षीला विचारतो की मी तुला अर्जुन व सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल सांगितलं होतं तू कोणाला सांगितलं नाहीस ना उगीच कोणाला सांगून विश्वासघात हा थप्पा लागायला नको म्हणून मी तुला विचारतोय तेव्हा साक्षीला थोडासा डाऊट येतो की अचानक आता चैतन्य असं का विचारत आहे. त्यानंतर इकडे पूर्णा आजीला साक्षी सगळं काही खरं सांगते. त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यांनी एकमेकांच्या फायद्यासाठी हे लग्न केलं आहे पण यात अर्जुनचा नेमका स्वार्थ काय हेच मला कळालेलं नाही. मला ही गोष्ट चैतन्यने सांगितली. तेव्हा पूर्णा आजी विचार करू लागते आणि सांगते की, तू जे बोलत आहे ते सगळं काही सत्य असेल तर मी आत्ताच्या आत्ता सायलीला या घराबाहेर काढेन असं म्हणत पूर्णा आजी खाली येतात आणि सायलीला म्हणतात की, अजून किती दिवस या घराभोवती विळखा घालून बसणार आहेस. त्यावर सायली म्हणते, आता मी काय केलं यावर पूर्णा आजी सायलीच्या हाताला धरतात आणि सांगतात की, आज मी तुझा गुन्हा सिद्धच करून दाखवते आणि असं म्हणत तिला देवघरात घेऊन जातात आणि देवावर हात ठेवून शपथ घ्यायला लावतात की, अर्जुन आणि तिचं हे प्रेम खरं आहे आणि त्यांनी खरंच लग्न केलं आहे. यावर सायली शपथ घेत सांगते की, हो माझं आणि यांचं लग्न झालं आहे आणि माझे यांच्यावर भरपूर प्रेम आहे.
हे पाठीमागे उभा राहून अर्जुनही ऐकत असतो आणि सायली पटकन बोलून जाते. आता सायलीने तर प्रेमाची कबुली दिलेली असते. मात्र हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सिद्ध करण्यासाठी आता साक्षी व प्रिया काही डाव तर आखणार नाही ना?, हे सर्व पाहणे मालिकेत रंजक ठरेल.