‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, संजना नव्या नवरीच्या म्हणजेच आरोहीच्या मनात गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करते. आरोही व यशच्या लग्नानंतर घरात लग्नाचं वातावरण असतं त्यामुळे सगळेजण थकून आलेले असतात. तर आरोही सकाळ सकाळ उठून किचनमध्ये चहा बनवत असते. तेवढ्यात संजना तिथे येते आणि आरोहीला पाहून तिला धक्का बसतो. संजना म्हणते की, तू एवढ्या सकाळी उठून चहा का बनवत आहेस. तू आराम कर. अजून तर तू नवीन नवरी आहेस. हे ऐकून आरोही म्हणते की. मला लवकर जाग आली म्हणून मी इथे आले आणि म्हटलं चहा करावा. (Aai Kuthe Kay karte Promo)
संजना यावर म्हणते की, मी जेव्हा लग्न होऊन पहिल्यांदा इथे आले तेव्हा देखील मी अशीच तयारी करण्यासाठी किचिनमध्ये आले होते. तुला पाहून मला माझ्या त्या दिवसांचीच आठवण आली. मात्र तेव्हा मी किचनमध्ये आले तेव्हा अरुंधतीने सगळं काही आधीच बनवून ठेवलं होतं आणि याचं कारण सुद्धा माझ्या लक्षात आलं कारण मी इथे कोणामध्ये मिक्स होऊ नये म्हणून तीने मुद्दाम आधीच सगळं करुन घेतलं होतं. अरुंधतीने कधीच मला व अनिरुद्धला सुखाने जगू दिलं नाही. अरुंधतीने आमच्या बाबतीत फारच मध्येमध्ये केलं. यावर आरोही संजनाला सांगायचा प्रयत्न करते की, आई अशा नाही आहेत. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेव्हा संजना म्हणते की, अरुंधती माझ्या व अनिरुद्धच्यामध्ये आली आणि आताही ती मध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे.
यावर आरोही तिला सडेतोड उत्तर देत म्हणते की, आई तुमच्या मध्ये नाही आल्या. आई तुमच्या व बाबांच्या मध्ये आल्या की तुम्ही आई व बाबांचा संसार म्हणून त्यांच्यामध्ये आल्या. हे ऐकल्यावर संजना शांत बसते. तितक्यात तिथे अरुंधती येते. आरोहीच्या मनात संजना गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करते हे अरुंधतीच्या लक्षात येतं.
संजना मुद्दाम अरुंधतीला बोलते की, गौरीपण इथे अशीच यायची. फक्त यश व गौरीचं लग्न व्हायचं बाकी होत. गौरीपण अशीच किचनमध्ये, घरामध्ये यायची. यावर अरुंधती आरोहीला म्हणते, आरोही तुला यश व गौरीबद्दल सर्वकाही माहित आहे. त्यामुळे दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून तर्क वितर्क लावत बसू नकोस. तू काही कोणाचं ऐकून त्यावर विश्वास ठेवण्याऐवजी तू थेट तुझ्या नवऱ्याशी जाऊन स्पष्ट बोल. त्यावर आरोही होकार देत, हो आई माझ्या आणि यशमध्ये तेव्हढी मोकळीक आहे असं म्हणते.