‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येत आहेत. मालिकेत सायलीने अर्जुनसमोर साक्षीचा खरा चेहरा आणलेला असतो. साक्षी ही त्याचा मित्र कुणालची गर्लफ्रेंड असते हे सत्य अर्जुनला कळालेलं असतं. अर्जुन हे सत्य चैतन्यला सांगण्याचा खूप प्रयत्न करतो. चैतन्यचं आयुष्य कुणालसारखं उध्वस्त होऊ नये अशी त्याची एकच इच्छा असते. अर्जुन चैतन्यला फोन करून घरी बोलावून घेतो. तेव्हा चैतन्य हा साक्षीबरोबरच अर्जुनच्या घरी येतो. साक्षीला समोर पाहून अर्जुनचा राग अनावर होतो. (Tharal Tar Mag Serial Update)
त्यावेळी चैतन्य साक्षीची बाजू सांभाळात म्हणतो की, ही माझी होणारी बायको आहे त्यामुळे तुला जे काही बोलायचं असेल ते तू हिच्या समोरच बोल. हे ऐकून अर्जुनचा पारा अजूनच चढतो. अर्जुन चैतन्यला म्हणतो की, तुझ्या आयुष्याचा विचार करून तुझ्या आयुष्याचं काही बरं वाईट होऊ नये म्हणून मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्यामुळे प्लिज हिला खाली जाऊन उभं राहायला सांग नाहीतर काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत तो नसतो.
चैतन्य हा अर्जुनला सांगतो की, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे, असं म्हणून तो निघून जातो. त्यामुळे अर्जुन चैतन्यपर्यंत साक्षीचा खरा चेहरा आणू शकत नाही. तर एकीकडे घरी आल्यावर चैतन्य साक्षीला सांगतो की, विलासच्या खुनाचा मी सखोल अभ्यास करत या केसमध्ये विशेष लक्ष देणार आहे. त्यामुळे तू त्या दिवशी दिवसभर काय काय केलं होतं याचा मला सगळा तपशील दे. हे ऐकून साक्षी पूर्णता घाबरते. चैतन्य या केसमध्ये अडकला तर साक्षीचे धागेदोरे त्याला मिळतील या भीतीने आता विलासच्या केसपासून चैतन्यला ती कशी दूर ठेवणार, हे पाहणं ही रंजक ठरेल.
अर्जुनचा हा राग घालवण्यासाठी सायली त्याला एक छोटसं सरप्राइज द्यायचं ठरवते. सायली व अर्जुनची पंधरा मिनिटांची रोमँटिक डेट मालिकेत पाहायला मिळणार आहे. सायली अर्जुनला घेऊन तिच्या स्कुटी वरून टपरीवर जाते. तिकडे तिने सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. दोघेही एकत्र कॉफी पिताना दिसतात. त्यानंतर ते रोमँटिक गाण्यावर डान्सही करतात. अर्जुनचा राग घालवण्यासाठी प्लॅन केलेली ही रोमँटिक डेट नेमकी काय आहे हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.