‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते व कलाकार मध्यंतरी बरेच चर्चेत होते. या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारलेले अभिनेते शैलेश लोढा व असित मोदी यांच्यामधील वाद तर जगजाहिर आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांच्याविरोधात शैलेश यांनी तक्रार दाखल केली होती. जवळपास १४ वर्षे मालिकेत काम केल्यानंतर शैलश यांनी ‘तारक मेहता…’मधून काढता पाय घेतला. थकबाकी न भरल्याबाबत त्यांच्याविरोधात असित मोदी यांच्याविरोधात शैलेश यांनी खटका दाखल केला. आता त्यांनी हा खटला जिंकला असल्याचं समोर आलं आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, २०२२मध्ये शैलेश या मालिकेमधून बाहेर पडले. याच वर्षाच्या सुरुवातीला असित मोदींच्या विरोधात त्यांनी खटला दाखल केला. वर्षभराच्या थकबाकीच्या मंजुरीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) शी संपर्क साधत शैलेश यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणाबाबत व्हर्चुअल सुनावणी झाली आहे. आता शैलेश यांना १ कोटी ५ लाख ८४ हजार रुपये मिळणार आहेत.
आणखी वाचा – नितीन देसाईंच्या अंतिम दर्शनाला बॉलिवूड कलाकारांची गैरहजेरी, आमिर खान म्हणतो, “कदाचित त्यांना…”
“ही लढाई पैशांसाठी कधीच नव्हती. न्याय व आत्मसन्मानासाठी हा लढा होता. सत्याचा नेहमीच विजय होतो. एखादी लढाई जिंकल्यासारखा मला आनंद होत आहे. थकबाकी मिळण्यापूर्वी काही कागदपत्रांवर मी सही करावी असं त्यांना वाटत होतं. प्रसारमाध्यमांशी संपर्क साधू नको आणि इतर काही त्यांच्या अटी होत्या. पण पैसे मिळवण्यासाठी मी कोणत्याही कागदपत्रांवर सही का करु?” असं शैलेश यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
आणखी वाचा – जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही जिनिलीया देशमुख, म्हणालेली, “तेल न वापरता मी…”
पुढे ते म्हणाले, “या एका कलाकाराला जवळपास तीन वर्षांपेक्षा अधिक काळ त्याचं मानधन मिळालं नव्हतं. त्या कलाकाराचं नाव मी घेऊ इच्छित नाही. पण मी खटला दाखल केल्यानंतर त्या कलाकाराला प्रॉडक्शन हाऊसच्या ऑफिसमध्ये बोलावण्यात आलं. तसेच त्याची संपूर्ण थकबाकी देण्यात आली. त्यानंतर फोन करुन त्याने माझे आभार मानले”. शैलेश यांच्या व्यतिरिक्त इतर काही कलाकार या मालिकेतून बाहेर पडले आहेत.