‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’… छोट्या पडद्यावरील सध्या गाजत असलेली मालिका. मालिका विश्वात एक वेगळाच विषय घेऊन आलेली ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. नुकतेच मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले असून या मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे व खिळवून ठेवणाऱ्या कथानकामुळे प्रेक्षकांचा ही मालिका बघण्याचा कल वाढत आहे. त्रिनयना व विरोचक यांच्यातील युद्धावर मालिकेचे कथानक अवलंबून आहे.
मालिकेत नुकताच अस्तिका अद्वैतच्या प्रेमात पडली असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला आणि आस्तिकाचे हे सत्य रुपालीला माहित झाले आणि त्यामुळे रुपाली अस्तिकाला अद्वैतला मारण्याचा सल्ला देते. यावरून गेले काही दिवस अस्तिका अद्वैतचा जीव घेणार की नाही? हा प्रश्न पडला आहे. आशातच आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात रुपाली घरच्यांच्या मनात आणखी भिती घालणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रुपाली असं म्हणते की, “असं म्हणतात की भीतीने माणूस मरतो. पपण आता इतही भीती घालूनही त्या भीतीचीच भीती वाटणं आता बंद झालं आहे. फाल्गुनी, तेजस सगळेच माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायला लागलेत. त्यामुळे आता भीती वगैरे काही नाही आता थेट वार करायचा. या घरात मृत्यूचं तांडव घालायचं.”
दरम्यान, या नवीन प्रोमोमुळे आता प्रेक्षकांमध्ये वेगळाच उत्सुकता निर्माण झाली आहे. रुपालीने दिलेल्या या इशाऱ्यामुळे घरातील नक्की कुणाचा मृत्यू होणार?, कुणाचा जीव जाणार? याचे चाहते मंडळी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अशातच नुकताच अस्तिकाचा मृत्यू झाल्याचाही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.