मनोरंजन विश्वात काम करताना या क्षेतरांगे जितकं ग्लॅमर आहे, टीकांच या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाचा प्रवास हा खडतर आहे. या इंडस्ट्रीत काम करणारी अनेक कलाकार मंडळी धावळपीच्या जगातून मन:शांती मिळवण्यासाठी अनेक पर्यायांचा अवलंब करतात. प्रवास, वाचन, योगा, ध्यानधारणा अशा अनेक मार्गांनी कलाकार मंडळी आपली मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच मन:शांतीसाठी सोशल मीडिया व सिनेसृष्टीपासून लांब गेलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.
आपला स्टायलिश अंदाज, अभिनय व हटके नृत्यकौशल्य यामुळे चर्चेत राहणारी संस्कृती गेली काही दिवस तिच्या सोशल मीडियापासून लांब होती. त्यामुळे अनेकांना ही अभनेत्री नेमकी गेली कुठे याबद्दल प्रश्न पडला होता. मात्र आता स्वत: अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “मी अजूनही काँक्रिटच्या जगात परत जात आहे, पण त्याचबरोबर मी नक्की कुठून सुरुवात करावी हेदेखील शोधत आहे. मी एक अशी व्यक्ती आहे, जिने आयुष्यात कधीही ध्यान केले नाही आणि एक दिवस ती ‘विपश्यना’ करावी असा विचार करते. एखादे बंधन मला कधीही अस्वस्थ करणारे नव्हते. पण ध्यानधारणा ही मला अस्वस्थ करणारी होती.”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “विपश्यना करताना दिवसातून आठ तास तुम्हाला तुमच्या अस्थिर मनाला स्थिर करावे लागते. आणि हे खूपच अवघड होते, पण हळूहळू ते बदललते. ध्यानधारणा हे जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन निर्माण करतं. असे म्हटले जाते की, ‘विपश्यना’ हा एक सराव व प्रयत्न आहे. विपश्यना तुम्हाला आधार देते, तुम्हाला कोण आणि काय महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देते, तुम्हाला शहाणे बनवते, या जगात जे काही आहे ते सोपे करते.”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “याठिकाणची गोठवणारी थंडी, पाणी टंचाई, वीज पुरवठ्याचा अभाव अशी परिस्थिती होती. मात्र मला पर्वत, शांतता, शुद्ध हवा या गोष्टींपुढे या अडचणी मागे पडल्या. कृपया तुमच्या आयुष्यात एकदा तरी ‘विपश्यना’ करा आणि जरी तुम्ही नाही केले तरी तुम्ही फक्त तुमचा हेतू शुद्ध ठेवा, अंतःकरण दयाळू ठेवा आणि कायम चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवा.” दरम्यान, अभिनेत्रीने १५ एप्रिल रोजी ही पोस्ट शेअर करत ती लडाखमध्ये असल्याची माहिती देत याचे कारणही तिने सांगितले आहे. याआधी तिने १० मार्च २०२४ रोजी शेवटची पोस्ट शेअर केली होती.