सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांचं कलाक्षेत्रात योगदान मोठं आहे. त्याचबरोबरीने बॉलिवूडमधील नावाजलेल्या कुटुंबियांपैकी खान कुटुंबियही टॉपला आहे. मात्र बऱ्याचदा कामाबरोबरच सलमान आणि त्याच्या भावांचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. सलमान लग्न कधी करणार? हा प्रश्न कायमच त्याला विचारला जातो. इतकंच काय तर त्याच्या गर्लफ्रेंड्स आणि लव्ह लाइफबाबतही अनेक चर्चा रंगतात. त्याची भावंड अरबाज व सोहल खानही खासगी आयुष्यामुळे टॉक ऑफ द टाऊन ठरले. अरबाजने मलायका अरोरासह घटस्फोट घेत दुसरं लग्न केलं. तर सोहल खानचाही तब्बल २० ते २२ वर्षांचा संसार मोडला. सलमानने आता याचबाबत भाष्य केलं आहे. (salman khan on sohail seema divorce)
कपिलचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चं तिसरं सीझन सुरु झालं आहे. याचा पहिला भाग नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. पहिल्या भागामध्ये सलमाननेच हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्याबाबतही भाष्य केलं. शिवाय लग्न कधी होणार? हे जाणून इतरांना काय करायचं आहे? असं स्पष्ट शब्दांत सलमानने यावेळी सांगितलं. “माझं आयुष्य मस्त चाललंय” असंही तो म्हणाला. सलमानने सोहेल खानचा घटस्फोट आणि त्याच्या पत्नीबाबत भाष्य केलं.
आणखी वाचा – गिरीजा ओकच्या पायाला मोठी दुखापत, रुग्णालयामध्ये उपचार सुरु, उभं राहण्यासाठीही त्रास अन्…
सलमानच्या घरी कोणालाही कधीच जेवणासाठी नाही बोललं जात नाही, कोणीही येऊन घरी राहू शकतं. सलमानने त्याचा मित्र आणि फोटोग्राफर अविनाश गोवारिकरचं उदाहरणही दिलं. अविनाशच्या घराची समस्या असताना तो सलमानकडे दोन-अडीच महिने राहण्यासाठी आला. पण सलमानच्या घरात त्याने जवळपास दोन वर्ष काढले. अविनाश तिथून गेलाच नाही. दरम्यान सोहेलचं लग्न झालं होतं.
सोहेलच्या लग्नानंतर अविनाशला रुम खाली करण्यास सांगण्यात आलं. सोहेलने पळून लग्न केलं असल्याचा खुलासा यावेळी सलमानने केला. हा संपूर्ण किस्सा सांगताना सलमान म्हणाला, “सोहेलने पळून लग्न केलं. आता तीही (सोहेलची पूर्वाश्रमीची पत्नी) पळून गेली”. सलमानचं हे बोलणं ऐकून सगळेच पोट धरुन हसू लागले. सोहेल व सीमा सजदेहने आर्य समाज पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर १९९९८मध्ये त्यांनी निकाह केला. सोहेलला दोन मुलं आहेत. २४ वर्षांच्या संसारानंतर २०२२मध्ये सोहेल व सीमाचा घटस्फोट झाला.





