सध्या मनोरंजनविश्वात ‘अॅनिमल’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. आज म्हणजेच १ डिसेंबर रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. बॉबी देओल, रणबीर कपूर, रश्मिका मंदाना व अनिल कपूर यांच्या दमदार भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हिट झाला आहे. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट आवडल्याचे मतही व्यक्त केले आहे. अशातच या चित्रपटाच्या निर्मात्यांना चिंतेत पाडणारी एक बातमी समोर आली आहे. (Animal Movie Leaked)
पहिल्याच दिवशी हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. अनेक ऑनलाइन वेबसाइट्सवर हा चित्रपट लीक झाला असून या वेबसाइट्सवर चित्रपटाची गुणवत्ता देखील चांगली असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर हा चित्रपट बघायला गेलल्या प्रेक्षकांपैकी काही उत्साही प्रेक्षकांनी या चित्रपटातील काही सीन मोबाईलमध्ये शूट करुन ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान ‘जवान’, ‘पठाण’ या बहूचर्चित चित्रपटांबाबतही हा प्रकार झाला असल्याचे काहींनी म्हटले आहे. चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यानंतर चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक त्याचबरोबर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला आहे. निर्मात्यांसाठी ही चिंतेची बाब असून चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईला याचा चांगलाच फटका बसणार आहे.
आणखी वाचा – आर्या आंबेकरचा मोठा निर्णय, सोशल मीडियापासूनही दूर राहणार, पोस्ट शेअर करत म्हणाली, “आपल्या आयुष्यात…”
‘ॲनिमल’ची पहिल्याच दिवसाची कमाई ही जवळपास ६० कोटी रुपयांहून अधिक आहे. तर ‘ॲनिमल’च्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरुन शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने उत्तर अमेरिकेत १ मिलियन डॉलर्सचा आकडा पार केला आहे. त्यामुळे अवघ्या जगभरात या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई ही जवळपास १०० कोटींच्या घरात जाणार असल्याचेही म्हटले जात आहे.
आणखी वाचा – Animal Review : भावनेच्या रक्ताने माखलेला Animal
दरम्यान रणबीरच्या आयुष्यातील हा अतिशय महत्वाचा चित्रपट असून या चित्रपटाचा त्याच्या करिअरवर मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान हा चित्रपट ऑनलाईन लीक करणाऱ्यांवर काही कारवाई होणार का? ऑनलाइन लीक झाल्यामुळे याचा चित्रपटावर किंवा चित्रपटाच्या कलेक्शनवर याचा काही परिणाम होणार का? त्याचबरोबर चित्रपटाच्या निर्मात्यांना याचा कितपत फटका बसणार? याची सर्वांनाच चिंता लागली आहे.