महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या विनोदी कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. झी मराठीवरील या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. यातील सगळी कलाकार मंडळीही प्रेक्षकांची बरीच लाडकी आहेत. सर्व कलाकारांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. कलाकार प्रत्येकवेळी वेगवेगळ्या भूमिकांसह नवीन काहीतरी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. कलाकारांबाबत जाणून घ्यायला प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्याची वेगळी अशी गोष्ट असते. अशीच गोष्टी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या कलाकार स्नेहल शिदमचीही आहे.(Snehal told story about food)
स्नेहलने आजपर्यंत कार्यक्रमात सगळ्या विनोदी भूमिका अगदी सहजपणे साकारल्यात. पण जेवढ्या सहजतेने तिने या भूमिका साकरल्या तितकं सहज तिचं आयुष्य नव्हतं. याबाबत खुलासा करताना तिने ‘इट्स मज्जा’च्या ‘माझ्या घराची गोष्ट’ या कार्यक्रमात मुलाखतीत तिच्या आयुष्यातील प्रवासबाबत सांगितलं.“आम्ही आतापर्यंत चाळीतल्या घरात राहत आलो आहोत पण हे घर घ्यायच्या अगोदर आम्ही एका भाड्याच्या घरात राहत होतो. मुंबई जेव्हा पाण्याखाली गेली होती तेव्हा अगदी आमचंही घर दिसत नव्हतं. तेव्हा आमच्यासमोर वेगळी आव्हाने होती”.
वाचा – काय घडलं होतं नेमकं स्नेहलच्या घरी?(Snehal told story about food)
पुढे तिने सांगितलं, “मी त्याकाळात डान्सचे कार्यक्रम करायचे. एकदा माझ्याबरोबर सगळेच डान्सच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. घरी कोणीही नव्हतं. आम्ही घरी जेवण बनवून गेलो होतो. पण जेव्हा आम्ही घरी आलो तेव्ही घरभर जेवणाची नासाडी झाली होती”.परिस्थितीचा उलघडा करत ती म्हणाली, “ हा सगळा प्रकार आम्ही घरी नसताना उंदिरांनी केला होता. चाळी म्हटली की उंदरांचा वावर आलाच. आम्ही कोणीच घरी नाही म्हणून उंदरांनी सगळं अन्न घराभर नासाडी केलं होतं”.
अन्नाची झालेली नासाडी बघून स्नेहलच्या बाबांना खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा त्यांनी विचार केला की आज मुलांच्या समोरील अन्न गेलं आहे. हे पुन्हा होता नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हे घर दुरुस्त करण्याचं ठरवलं आणि आताची वास्तू उभी आहे”.स्नेहल आज चला हवा येवू द्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. तिचा अभिनय लोकांना खूप आवडतो. तिने स्वतःची वेगळी ओळख या क्षेत्रात निर्माण केली आहे.