मराठी चित्रपटसृष्टीमधील अविनाश नारकर हे लोकप्रिय अभिनेते आहेत. १९९४ साली ‘मुक्ता’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून काम केले. त्यांच्या सर्व भूमिका प्रचंड गाजल्या. चित्रपटांबरोबर त्यांनी अनेक नाटके व मालिकांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुकताच त्यांनी ‘झी नाट्यगौरव २०२४’ या सोहळ्यादरम्यान त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या नाटकाबद्दलच्या आठवणी प्रेक्षकांबरोबर शेअर केल्या आहेत. त्यांनी एका नाटकामध्ये घडलेला प्रसंग सांगितला आहे. यामुळे त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. (actor avinash narkar on play )
अविनाश यांनी चित्रपटांबरोबरच अनेक नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. अशाच एका नाटकादरम्यानचा किस्सा सांगितला आहे. हा व्हिडीओ ‘झी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा किस्सा सांगताना ते म्हणाले की, “हा रणांगण नाटकातील एक मजेशीर किस्सा आहे जो मि आयुष्यात कधीही विसरणार नाही. शिवाजीमंदिर येथे या प्रयोग सुरु होता. त्यामध्ये एक सीन असा होता ज्यामध्ये भाऊसाहेब पेशवा उत्तर मोहिमेचा विडा उचलतात. तिथे रघुनाथराव लेखणी मोडतात आणि म्हणतात की हा विडा मी उचलणार असं म्हणून मी मंचावर फिरायचो व स्टेजच्यामध्ये येऊन समोर सिंहासनावर बसलेल्या नानासाहेब पेशव्यांकडे हात वर उचलून विडा उचलून जाहीर करायचो.त्यानंतर नानासाहेब सिंहासनावरुन उठून तलवार घेऊन माझ्याकडे यायचे आणि माझ्या हातात तलवार द्यायचे आणि मला मोहीम फत्ते करुन येण्यास सांगायचे”.
पुढे ते म्हणाले की, “चालत जात असताना गोपिकाबाई थांबवायच्या. हा प्रयोग असाच सुरु असताना नानासाहेब अचानक माझ्या दिशेने पटापट चालत आले आणि मला गच्च धरुन माझ्या हातात तलवार दिली. पण त्यांनी मला फिरवले नाही आणि मी जायच्या ऐवजी ते स्वतःच चालत गेले. मी सीन पूर्ण करुन त्यांच्या मागे विंगेत गेलो. त्यांना विचारले की नक्की काय झाले. ते उठले आणि नानासाहेबांनी माझे पाय धरले आणि म्हणाले मी काय सांगू आणि म्हणाले की मी नंतर उठताच माझ्या पायजम्याची नाडी तुटली आणि पायजमा खाली आला. पण नानासाहेब पेशव्यांचा अंगरखा घोळदार असल्याने ते जास्त कोणाला दिसले नाही आणि झटकन ते आतमध्ये निघून गेले”.
अशाप्रकारे अनेक मजेशीर किस्से नाटकात होत असतात असे त्यांनी सांगितले. अविनाश यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ते नुकतेच ते ‘कन्यादान’ या मालिकेमध्ये दिसून आले होते. तसेच ते सोशल मीडियावर देखील जास्त प्रमाणात सक्रिय असतात.