Aarti Solanki Video : प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. कधी ते अनुभव चांगले असतात तर कधी ते अनुभव वाईट असतात. या सगळ्यातून माणूस काही ना काही शिकत जातो. पण काही असे अनुभव असतात जे आपल्याला पूर्णपणे तोडून ठेवतात. असाच एक अनुभव मराठमोळी विनोदी अभिनेत्री आरती सोळंकीने सांगितला. आजवर आरतीला मनोरंजन क्षेत्रात काम करताना विविध अनुभवांना, अपमानांना सामोरं जावं लागलं. याबाबत नुकताच तिने खुलासा केला. आरती ‘इट्स मज्जा’ चॅनलच्या ‘मज्जाचा अड्डा’ कार्यक्रमात आली होती. त्यावेळी तिने तिच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. खासगी आयुष्याबद्दल बोलताना तिने तिच्या आईने तिच्यासाठी केलेल कष्ट व त्यांना झालेला त्रास याबाबत भाष्य केलं.(Aarati told mother to not work and channel banned her)
आरतीचे वडिलांना तिच्या आईला सोडल्यानंतर तिच्या आईने त्यांना एकटीने सांभाळलं. याबाबत सांगताना आरती म्हणाली, “आई सकाळीच माश्यांच्या लिलावाला जायची. सकाळचा लिलाव ६.३०ला असायचा त्यामुळे त्याअगोदर तिला घरातून बाहेर पडणं भाग असायचं. त्यांनंतर तिला अगदी शेवटच्या लिलावापर्यंत थांबवं लागायची. कारण मासे खूप यायचे. त्यामुळे तिथे राहणं तिला भाग असायाचं. तेवढा वेळ आई बाहेरच असायची. त्यामुळे आमच्या शिक्षणापासून आम्हाला शाळेत नेऊन सोडण्यापर्यंत सगळं काही आमचं शेजाऱ्यांनीच केलं”.
आरती पुढे सांगते, “या सगळ्या परिस्थितीमुळे मी ती गरीबी बघितली आहे. त्यामुळे मी आजवर माझा स्वाभिमान जपत आले. आतापर्यंतचे मला आलेल्या अनुभवांमध्ये आणि त्या परिस्थितींमध्ये मला ही भीती नाही वाटली की मला चटणी भाकरी खावी लागेल. कारण मी अगोदरपासून चटणीभाकरी खाणारी मुलगी आहे. रोजची बिर्याणी खाणाऱ्याला ही भिती असते. त्याच्यामुळे जेव्हा फु बाई फु मुळे मला चांगले दिवस यायला लागले. त्यानंतर मी ठरवलं की आईला आता काम करु द्यायचं नाही. मी तिला येऊन म्हणाले तु २५ वर्ष बर्फात काम केलं. तु काम करायच नाही. पण ज्यावेळी मला चॅनलनं बॅन केलं तेव्हा मला वाईट वाटलं की इतक्या वर्षांनी जेव्हा मी माझ्या आईला घरी बसवलं आणि तेव्हा तुम्ही मला घरी बसवल”, आरतीने आजवर बऱ्याच प्रसंगांना सामोरी गेली आहे. पण हा प्रसंग सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आलं.
तिची स्वतःची परिस्थिती स्पष्ट करताना आरती म्हणाली, “तेव्हा माझं असं झालं. की त्यानंतर मी आईला सांगूही शकत नव्हते की तू परत कामाल जा. त्या चॅनलवर माझा मुळात राग नाही. कारण त्या चॅनलमुळेच मी लोकांपर्यंत पोहोचले. पण माझा यावर राग आहे की माझ्या आईला मी घरी बसवलं आणि यांनी मलाच घरी बसवलं”, हे सांगताना आरतीचे डोळे पाणावले होते.