‘खिचडी’या चित्रपटाने सर्वांनाच खळखळवून हसवले आहे. या चित्रपटातील प्रफुल्ल,हंसा,हिमांशु,बाबूजी,जयश्री या सर्वांनीच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. हंसाची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठक यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. पण प्रफुल्लची भूमिका साकारणारे राजीव मेहता हेही अधिक प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी मालिका व चित्रपटांमध्ये चांगल्या भूमिका न मिळाल्याची खंत बोलून दाखवली आहे. (Rajeev Mehta on movie roles)
‘खिचडी’ हा विनोदाचा हलका फुलका शो प्रेक्षकांनी अधिक पसंत केला.प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. पण आता मालिका व चित्रपटांमधून मिळणाऱ्या भूमिकांवर त्यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नुकतीच एका माध्यमाला मुलाखत दिली आहे. ते म्हणाले की, “मला आतापर्यंत कमी लेखण्यात आलं. ‘खिचडी’सारखा शो आणि चित्रपटामध्ये काम केल्यानंतरही मला निर्मात्यांकडून चांगल्या ऑफर्स आल्या नाहीत. मी ‘रंगीला’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले पण माझ्यावर कोणीही तितके लक्ष दिले नाही. पण त्यामध्ये आमिरबरोबर केलेली वेटरची भूमिका मात्र हीट झाली. ही भूमिका खूप लहान होती. पण यामधील संवाद हसवणारे होते”.
पुढे ते म्हणाले की, “बुढ्डा होगा तेरा बाप’या चित्रपटामध्ये काम केले. तो चित्रपट इतका चालला नाही पण त्यातील भूमिका मी खूप एंजॉय केली होती. मी आता नीरज पांडे याच्या चित्रपटामध्ये काम करत आहे. हुशार निर्मात्यांबरोबर काम केल्यानंतरही चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. मी ‘बा,बहू और बेबी’ सारख्या मालिकेमध्येही काम केले आहे. मला कधीही मालिका व वडील किंवा सासऱ्यांची भूमिका करायची नव्हती. सध्या मालिकांचा चांगला कंटेंट बनत नाही आहे”.
२०१०मध्ये आलेल्या ‘खिचडी’ या चित्रपटाला खूप पसंती मिळाली. त्यामुळे निर्मात्यांनी १३ वर्षांनी चित्रपटाचा सिक्वल आला. पण ‘खिचडी २’ने कोणतीही जादू दाखवली नाही. खिचडीव्यतिरिक्त राजीव सारभाई व्हर्सेस साराभाई’, एक दुसरे से करते है प्यार हम’, ‘बडी दूर से आये हम’ या मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. तर ‘बेटा’,’सत्या’,’हेरा फेरी’, ‘खिलाडी ४२०’ ‘वक्त’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकरल्या आहेत.