Malaika Arora Talks About Her Divorce: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. काही वर्षांपूर्वीच मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा डिवोर्स झाला. अशातच नुकतंच अभिनेत्रीने घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं आहे. आता मलायका हिने देखील दुसऱ्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. मलायका अरोरा आणि अरबाज खान २०१६ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “जेव्हा मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांनी मला ट्रोल केलं. घरातील सदस्यांनी देखील माझ्या निर्णयाचा विरोध केला, पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. घटस्फोट घेतल्यानंतर मला कोणता पश्चाताप झाला नाही आणि होत देखील नाही. घटस्फोट झाल्यानंतर नेहमी महिलांना दोषी ठरवलं जातं. येथे पुरुषांनी घटस्फोट घेतला तर, कोणी काहीही बोलत नाही. पण हेच जर महिलेने केलं तर, ती आदर्श महिला नसते. माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. मी वैवाहिक आयुष्याचा अनुभव घेतला आहे आणि माझं कुटुंब आहे. मला प्रेम करायला आणि कोणाचं तरी प्रेम मिळवायला नक्कीच आवडेल. पण मी ते शोधत नाही. जर ते माझ्या आयुष्यात आपणहून आलं तर, मी त्याचा स्वीकार करेन.” असं अभिनेत्री म्हणाली. (Malaika Arora Talks About Her Divorce)
मलायका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने वयाच्या 22 व्या वर्षी अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अरबाज याने शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आणि एका मुलीचं जगात स्वागत केलं… तर मलायका हिचे अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत प्रेमसंबंध होते.. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. (Malaika Arora Talks About Her Divorce)




