भारतात लग्नसमारंभ म्हणजे जणू एक प्रकारचा मोठा सोहळाच असतो. कारण भारतीय संस्कृतीत लग्नाच्या प्रथा हा हजारो वर्षांपासून यशस्वीपणे पाळल्या जात आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की लग्नात होणाऱ्या प्रत्येक विधीमागे एक श्रद्धा किंवा शास्त्र असते. तुम्हाला माहीत आहे का लग्नात वधू-वरांना हळद का लावली जाते? किंवा वधूचे हात मेहंदीने का सजवले जातात? आणि याचे नेमके महत्त्व काय?. चला तर जाणून घेऊया या लग्न विधीमागील नेमके कारण काय?
लग्नापूर्वी जेव्हा हळद लावली जाते तेव्हा त्याचे काही अंश नाकावर पडतात आणि ते श्वासावाटे शरीरात जातात. शरीरामधील प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी हळद अधिक उपयुक्त असते. अलिकडच्या संशोधनामधून काही गोष्टी समोर आल्या आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, सर्दीपासून मुक्तता मिळवण्यासाठी, डोकेदुखी कमी होण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी अशा अनेक फादेशीर गोष्टींसाठी हळद नाकावाटे, शरीरामध्ये गेली तरी अनेक आजार दूर होतात. शिवाय शरीरावरही त्वचेला हळद लावल्यास अनेक शारिरीक फायदे तुम्ही अनुभवू शकता. एखादी मुलगी तिचं घर कायमचं सोडून दुसऱ्या घरी जात असताना तिच्या मनावर बराच ताण असतो. हा विचारांमुळे लग्नादरम्यान मुलींमधील हार्मोनल्सचं संतुलन बिघडतं. हार्मोनल्स पातळीचं संतुलन राखण्यासाठीही हळद लावण्यात येते.
फक्त हळद नव्हे तर लग्नाआधी मुलीला मेहंदीही लावली जाते. त्यामागेही काही कारणं आहेत. ज्या भागाला हळद लावली जाते त्या भागाला मेहंदी लावली जात नाही. ज्या भागावर मेहंदी लावली जाते त्या भागावर हळद लावली जात नाही. तळहातावर मेहंदी लावतात तर त्याच्या मागच्या बाजूला हळद लावतात. चेहऱ्याला हळद लावतात तर डोक्याला मेहंदी लावतात. मेहंदी आणि हळद एक उष्ण व एक थंड हा विरोधाभास आहे. आरोग्य चांगलं राहण्यासाठी उष्ण आणि थंड हे गुण एकत्र यावेच लागतात.
दरम्यान, भारतभरात अनेक ठिकाणी आजही अशी प्रथा आहे आणि ती एक सामान्य प्रथाच मानली जाते. लग्नाच्या आधी हळदीने नवरा-नवरीची दृष्ट काढली जाते. असे म्हणतात की हळद लावल्याने नव्याने आयुष्य सुरु करणाऱ्या नवरा नवरीला वाईट नजरेपासून सुरक्षा मिळते. ही श्रद्धा सुद्धा हळदीच्या पवित्रतेशीच निगडीत आहे. तसेच मेहंदी लावणे ही केवळ भारतीय परंपरा नाही, तर मेहंदीचेही आरोग्यासंबंधित अनेक फायदे होतात. त्यामुळे नवरीला मेहंदी लावण्यात येते.