गोविंदाने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ८०-९०चा काळ तर गोविंदाच्या चित्रपटांनी गाजवला. सुपरस्टार कलाकारांच्या यादीमध्ये गोविंदाचं नावंही टॉपला होतं. मात्र गेल्या काही वर्षात तो कुठेच दिसेनासा झाला. २०१९मध्ये गोविंदाने शेवटचा चित्रपट केला. मात्र तोही सुपरफ्लॉप ठरला. प्रसिद्धीने गगनभरारी घेतली असताना त्याच्या हाती पुन्हा अपयश का आलं? याबाबत गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांनी भाष्य केलं आहे. गोविंदाच्या अपयशाला त्याचेच चार मित्र जबाबदार असल्याचा दावा सुनिता यांनी केला आहे. मात्र त्यांचं नाव घेणं त्यांनी टाळलं. तसेच गोविंदाबाबतही त्या खूपच स्पष्ट बोलल्या. (Govinda wife sunita talk about his career)
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गेली १७ वर्ष गोविंदा कुठेच का नाही दिसला? असा प्रश्न सुनिता यांना विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या, “मला खोटं बोलता येत नाही म्हणूच आमचं सतत भांडण होतं. मला अधिक हुशारीपणा केलेला आवडत नाही. आज त्याच्याजवळ काही चार लोक आहेत. त्यामध्ये लेखक, संगीतकार, सेक्रेटरी आणि वकील अशी त्याची चार लोकांची टीम आहे. ते चारही जणं काहीच कामाचे नाहीत. ते फक्त गोविंदाची वाह वाह करतात. जर त्याने कोणतं म्युझिक बनवलं तर सगळे मिळून वाह वाह करतात. त्याऐवजी सत्य काय आहे हे सांगणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. मी जेव्हा खरं बोलायला जाते तेव्हा त्यांना मात्र दुःख होतं”.
सुनिता इथवरच थांबल्या नाहीत. त्यांनी गोविंदाबाबत अनेक दावेही केले. जग ओटीटी, विविध नव्या कथांकडे वळलं आहे. मात्र गोविंदा १९९०च्या कथांमध्ये, त्याच कामात अडकला असल्याचं सुनिताचं म्हणणं आहे. त्या म्हणाल्यायाचं सुनिताचं म्हणणं आहे. ती म्, “मी त्याला सांगते की, आता ९०चा काळ संपला आहे. आता २०२५ आहे. नेटफ्लिक्स, डिजिटल प्लॅटफॉर्मवर सध्या काय सुरु आहे हे बघ. पण तो त्याच्या वाह वाह प्रॉडक्शनवरच (चार मित्रांची टीम) अडकून राहिला आहे”.
गोविंदाने त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या त्या चार लोकांपासून दूर राहिलं पाहिजे असं सुनिता यांचं म्हणणं आहे. सुनिता म्हणाल्या, “मी त्याला त्याचा ग्रुप बदलायला सांगितला आहे. त्याच्याजवळ ४ ते ५ लोक आहेत जे गोविंदाला कधीच पुढे जाऊ देणार नाहीत. त्याला ही सगळी मी सत्य परिस्थितीही सांगितली”. ९०च्या दशकातील बॉलिवूडचा काळ गोविंदाने गाजवला. त्यावेळी त्याची भलतीच क्रेझ होती. कुली नंबर १, पार्टनर, दुल्हे राजा सारखे त्याचे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. २०१९मध्ये रंगीता राजा हा त्याचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र तोही बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. आता गोविंदा पुन्हा कमबॅक करणार का? हे पाहावं लागेल.