Renuka Shahane Motherhood Experience : आजही अशी अनेक कुटुंब आहेत ज्यांना वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असतो. अलीकडे हे चित्र बदलताना दिसत असलं तरी काही घरांमध्ये हे चित्र पाहायला मिळत. पहिला मुलगाच व्हायला हवा, दोन मुली झाल्या आता मुलगाच हवा असा अट्टाहास अनेकांच्या घरी केला जातो, आणि हो याला दोष मात्र त्या स्त्रीलाच दिला जातो. हा हे केवळ सर्वसामान्यांच्या घरीच नाही तर कलाकारांच्याही घरी झालं आहे. हो. सुशिक्षित, सुधारलेल्या घरातही असे किस्से घडलेले कानावर येतात. असाच एक किस्सा घडला आहे ज्येष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याबरोबर. पहिल्यांदाच रेणुका या गरोदर राहिल्या तेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून असाच काही अनुभव आला.
अभिनेत्री गौहर खानने नुकतेच तिचे यूट्यूब पॉडकास्ट ‘माँ नोरंजन’ लाँच केले आहे. या पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये गौहर खानने ज्येष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे यांना आमंत्रित केले होते. या एपिसोडमध्ये रेणुका शहाणे यांनी आई होण्याच्या त्यांच्या प्रवासाबद्दल आणि समाजातील विचित्र दबावांबद्दल मोकळेपणाने सांगितले. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी आशुतोष राणा यांच्याशी लग्न केलं. आधीच उशिरा लग्न झालं असल्याने त्यांनी लगेचच बाळाचा विचार केला आणि त्या वयाच्या ३६ व्या वर्षी त्या गरोदर राहिल्या.
आणखी वाचा – लग्नाच्या एका आठवड्यानंतर हिना खानने गाठलं रुग्णालय, हनिमूनदरम्यानच बिघडली तब्येत, म्हणाली, “खूप दुखतंय…”
गरोदरपणातील हा अनुभव शेअर करत त्या म्हणाल्या, “मी २००२ मध्ये माझ्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि बाळाच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी, माझ्या पतीची मैत्रीण असलेली एक डॉक्टर रुग्णालयात आली आणि मला म्हणाली, “आता तुला वजन कमी करावे लागेल”. मला समजले नाही की हा कसला दबाव आहे? मला पूर्णपणे धक्का बसला होता. एका आईवर मुलाला जन्म दिल्यानंतर लगेचच पूर्वीसारखे दिसण्याचा दबाव असतो, जणू काही काहीही झालेच नाही. फक्त एक चांगली व्यक्ती किंवा चांगली आई असणे पुरेसे नाही, तर परिपूर्ण दिसण्याचा दबावसुद्धा तिच्यावर असतो”.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी ३६ वर्षांची असताना पहिल्यांदा आई झाले. मुलं छान सुदृढ असल्यामुळे मी खुश होते. पण तेव्हाच कुटुंबातलं कोणतरी आमच्याकडे आलेलं आणि म्हणालं थॅंक गॉड तुला मुलगाच झाला. त्यांचं ते बोलण ऐकून मला वाईट वाटलं. आई झाल्याने मी खूश होते पण जर मुलगी झाली असती तर ते मला असं म्हणाले असते का? असा विचारचं कसा येऊ शकतो लोकांच्या मनात हा प्रश्न मला पडला. त्यांचे ते बोलणे माझ्या मनाला खूप लागले”.





