बॉलिवूडमध्ये नेपोटीजमबद्दल अनेकदा चर्चा होत असते. कंगना रणौतने अनेकदा स्टार किड्सवर निशाणा साधला आहे. अशातच आता अभिनेत्री विद्या बालनने देखील नेपोटीजमवर भाष्य केले आहे. ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटातून अधिक लोकप्रिय झालेली अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या बिनधास्त लूकमुळे व तिच्या दर्जेदार अभिनयाने सतत चर्चेत असते. सध्या ती तिचा आगामी चित्रपट ‘दो और दो प्यार’ या चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अभिनेता प्रतीक गांधी देखील दिसणार आहे. याचवेळी तिने आपल्या संघर्षाबद्दल सांगताना अनेक खुलासे केले आहेत. (vidya balan on nepotism)
विद्याने २००३ साली ‘भालो ठेको’ या बंगाली चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर तिने २००५ साली ‘परिणिता’या हिंदी चित्रपटामध्ये दिसून आली होती. यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता सैफ अली खान देखील दिसून आला होता. बॉलीवूडमध्ये तिने अभिनयाच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले. चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्याने तिने ‘इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. यावेळी तिला नेपोटीजमवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, “याचे उत्तर नक्की कसे द्यावे हे मला समजत नाही आहे. ही इंडस्ट्री कोणाच्याही बापाची नाही. अन्यथा इथे प्रत्येक बापाचा मुलगा किंवा मुलगी आज यशस्वी झालेले दिसले असते”.
पुढे ते म्हणाले, “मी माझे काम करुन खुश आहे. अनेकदा मला वाटायचे जर मला कोणाचा तरी आधार मिळाला असता तर तो काळ चांगला गेला असता. पण मला असे वाटते की याचा वास्तविकतेवर कोणताही परिणाम होत नाही”.
याचवेळी तिने ब्रेकअप व रिलेशनशिपवरदेखील भाष्य केले आहे. ती म्हणाली की , “मला रिलेशनशिपमध्ये धोका मिळाला होता. ज्या मुलाला मी डेट करत होते त्याने मला चीट केले. तो खूप वाईट होता”.
विद्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तिचा ‘दो और दो प्यार’ या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून यामध्ये इलियाना डीक्रुजदेखील अभिनय करताना दिसणार आहे. हा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच ती आता ‘भूल-भुलय्या ३’ मध्ये देखील दिसणार आहे.