बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून अधिक चर्चेत आहे. १५ फेब्रुवारी रोजी तिने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला. त्याचे नाव अकाय असे ठेवण्यात आले. जवळपास एका महिन्याने अनुष्काने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे अनुष्का पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे तिच्या चाहत्यांनी पाहिल्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान हा फोटो पाहिल्यानंतर ती भारतात परत येण्याच्या चर्चांनादेखील खूप उधाण आले. (Anushka sharma instagram post)
अनुष्काने मुलगा अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच फोटो शेअर केला आहे. पण हा फोटो एका जाहिरातीचा असून तिच्या हातात एक स्मार्टफोन दिसून येत आहे. त्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला असून निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. तसेच केस देखील छोटे आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
अनुष्काने फोटो शेअर करत, “दिवसाची सुरवात करण्यासाठी यापेक्षा अजून चांगला पर्याय काय असू शकतो”, असे कॅप्शन दिले आहे. खूप दिवसांनी फोटो पोस्ट केल्याने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की, “वहिनी दादाला सांगा केकेआरबरोबर पंगा घ्या…चांगले मनोरंजन होईल”, दूसरा नेटकरी म्हणतो की, “स्टेडियममध्ये आरसीबीला चीयर करण्यासाठी तुमची खूप आठवण येत आहे”, तसेच तिसरा नेटकरी म्हणतो की, “वहिनी, आयपीएल तुमची खूप आठवण काढत आहे”.
सध्या भारतात आयपीएल मॅच सुरु झाल्या असून विराट भारतात दाखल झाला आहे. पण त्याच्याबरोबर अनुष्का न आल्याने कोहली कुटुंब कायमचे लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मुलाचा जन्म होण्याच्या दोन महिने आधीच अनुष्का व विराट लंडनसाठी रवाना झाले होते. पण दोघांचीही मुलगी वामिका आता तीन वर्षाची झाली आहे. त्यामुळे तिचे नाव शाळेत टाकण्यासाठी अनुष्का व विराट कायमचे भारतात येऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे. मुलगा अकायच्या जन्माची बातमी दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली होती.