‘बिग बॉस’चे यंदाचे १७ वे पर्व अनेक कारणांवरुन चर्चेत राहिलं. याचे एकमेव कारण म्हणजे अंकिता लोखंडे व पती विकी जैन. अंकिता-विकी हे दोघे या शोमध्ये आल्याच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत राहणारी जोडी आहे. अशातच येत्या वीकेण्ड का वार’मध्ये करण जोहरने ‘वीकेण्ड का वार’ होस्ट केले. यावेळी त्यांनी काही स्पर्धकांना खडे बोल सुनावले. या यादीत अंकिता लोखंडेचा पती विकी जैन याचेही नाव आहे.
नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या प्रोमोमध्ये करण जोहरने विकीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्याने असे म्हटले की, “जेव्हा तुझी आई अंकिताला टीव्हीवर प्रेक्षकांसमोर ओरडत होती, तेव्हा तू तुझ्या पत्नीची बाजू का घेतली नाहीस?” त्यावेळी विकीने करण जोहरची माफी मागितली होती. पण करणच्या जाण्यानंतर विकीही गप्प बसला नाही. याबाबत त्याने अंकिताशी बोलून त्याचा राग व्यक्त केला.
यावेळी विकी असं म्हणाला की, “माझ्या कुटुंबाने तुला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी थांबवले आहे का? किंवा तुझ्या ड्रेसिंगबद्दल काही बोलले आहेत का? लग्नानंतर तू १० दिवसही माझ्या कुटुंबाबरोबर राहिली नाहीस आणि यावर त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही. “मी तुझ्या कुटुंबाबरोबर राहायला आलो, तेव्हा मी श्रीमंत जावयासारखा राहिलो की मुलासारखा? मी नेहमीच तुमच्या कुटुंबासाठी उभा राहिलो.”
हेही वाचा – “तुझा घटस्फोट झाला आहे का?”, जुई गडकरीला चाहत्याने विचारला थेट प्रश्न, अभिनेत्री म्हणाली, “अहो लग्न…”
तसेच यावेळी विकीने अंकिताच्या एक्स-बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतचाही उल्लेख करत असे म्हटले की, “जेव्हा मी तुझ्या आयुष्यात आलो तेव्हा सगळीकडे सुशांत आणि तुझ्या नात्याचीच चर्चा होती आणि मी ते सगळं सहन केलं. जर तुला माझा इतकाच त्रास होत होता, तर तेव्हा तू माझ्याशी लग्न का केलंस?.” दरम्यान, विकीचे हे बोलणे ऐकून अंकितालाही तिची चूक समजली आणि यावर तिने पुन्हा आपल्या पतीला सॉरीदेखील म्हटले.