मालिका म्हटलं की त्यात वेगवगेळी वळण ही आलीच. वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका या नेहमीच प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास मदत करत असतात. अशातच लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका. या मालिकेत राज, कावेरी यांची अनोखी केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतेय. तर रत्नमाला यांचा संयम वाखाणण्याजोगा आहे. मालिकेच्या भागांमध्ये अनेक रंजक वळण येत आहेत. रत्नमाला मोहितेंची प्रॉपर्टी सानिया आणि वैदेही यांनी बळकावली आहे आणि सत्ता स्थापन केली आहे. तर इकडे रत्नमाला कावेरी राज यांनी माहेरचा चहा या नावाने नवीन हॉटेल उघडलं आहे. (Bhagya Dile Tu Mala Update)
भाग्य दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत की, कावेरीच्या अंगावर राजमुळे पाणी पडलेलं असत आणि त्यामुळे तिला खूप सर्दी झालेली असते, दरम्यान राज आणि कावेरी यावरून भांडत असतात. तेव्हा रत्नमाला कावेरीची विचारपूस करते तेव्हा कावेरी हे सर्व काही राज मुळे झालं असं सांगते, तेव्हा रत्नमाला राजला दटावतात. त्यानंतर रत्नमाला दोघांसाठी गरमागरम सूप आणून देतात, राज आणि कावेरी दोघेही सूप एकमेकांना भरवत असतात, आणि त्यांचा रोमँटिक अंदाज या दरम्यान पाहायला मिळतोय.
पाहा काय घडलं भाग्य दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागात (Bhagya Dile Tu Mala Update)
तितक्यात वैदेही नशेत येते, आणि राज कावेरीला एकत्र पाहते, राज कावेरीला एकत्र पाहून वैदेहीचा राग अनावर होतो. त्याच क्षणी वैदेही सानिया जवळ जाते आणि तिला बोलते, पुढील पाच दिवसात तू मला दिलेल्या वचनाप्रमाणे राज माझा झाला नाही, आणि तू बोललेलं काही घडलं नाही तर माझ्या नावे असलेली ५० टक्के इस्टेट मी रत्नमाला यांना परत देईन. वैदेहीच हे वागणं पाहून सानिया हिला धक्काच बसतो. त्यानंतर इकडे रत्नमाला, राज कावेरी सोबत बोलत असतात. त्यावेळी तिथे सुदर्शन काका ही असतो. (Bhagya Dile Tu Mala Update)
हे देखील वाचा – ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत मोठं वळण- मालिकेत होणार स्वामीसुताची एन्ट्री
रत्नमाला चहाच्या टपरीवर माणूस ठेवण्याबद्दल बोलत असतात. त्या म्हणत असतात की ज्याला खऱ्या कामाची गरज आहे त्याला शोधायचं कस, तेव्हा राज म्हणतो काका बसेल टपरीवर हे ऐकून सुदर्शनला धक्काच बसतो. तर आता मालिकेच्या उद्याच्या भागात काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.
