बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावंत दिग्दर्शकांच्या यादीत आवर्जुन ज्याचं नाव घेतलं जातं तो म्हणजे अनुराग कश्यप. त्याने आपल्या चित्रपटांच्या कारकिर्दीत वेगळ्या व हटके आवाजांना बराच पाठिंबा दिला. त्याचे बरेच चित्रपट हीट ठरले पण या प्रसिद्ध दिग्दर्शकाला कठीण काळाचाही सामना करावा लागला होता. नुकताच त्याने त्याच्या त्या कठीण काळाबाबात खुलासा केला. त्याचा ‘मॅक्सिमम सिटी’ या प्रोजेक्ट बंद झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. त्यानंतर त्याला नैराश्येचाही सामना करावा लागला. याबाबत त्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. (Anurag kashyap shocking revelation)
नुकत्याच अनुरागने दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या त्या कठीण काळाबद्दल सांगितलं. ज्यावेळी तो ‘सुकेतू मेहता’ यांच्या ‘मॅक्सिमम सिटी’ या लोकप्रिय कादंबरीच्या सीरीजवर काम करत होते. अनुराग म्हणाला, “ते माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काम होतं. मी आजपर्यंत इतकं प्रामाणिक काम कधीच केलं नव्हतं. पण ‘नेटफ्लिक्स’ने या प्रकल्पातून माघार घेतल्यामुळे हा प्रकल्प बंद करावा लागला”. अनुराग पुढे म्हणाला, “हा प्रकल्प अचानक बंद झाल्यामुळे माझ्यावर खूपच वाईट परिणाम झाला. त्यावेळी मी पूर्णपणे नैराश्येत गेलो होतो. अस्वस्थ असल्यामुळे मला दारूचं व्यसनही लागलं होतं. या काळात मला दोनवेळा हृदयविकाराचा झटकादेखील आला होता. मला तेव्हा असं वाटत होतं की मी सगळं काही गमावलं”.
‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीत अनुरागने सांगितलं होतं की, लॉकडाऊनमुळे त्याची वेब सीरिज ‘अल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’चं शुटिंग लांबलं होतं. त्यामुळे तो खूप अस्वस्थ होता. त्या काळातही तो बराच नकारात्मक विचारांनी घेरला गेला होता.
‘मॅक्सिमम सिटी’ ही लेखक सुकेतू मेहता यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित अनुराग एक बेव सिरीज बनवत होते. अशा परिस्थितीत ‘तांडव’ या वेबसिरीजवर आलेल्या प्रतिक्रियांनंतर नेटफ्लिक्सने त्याच्या ‘मॅक्सिमम सिटी’ वेब सीरिजमधून माघार घेतली. मात्र त्यांनी त्याबाबतचं कोणतंही कारण स्पष्ट केलं नाही. तो काळ अनुरागसाठी खूप कठीण गेला.