‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, प्रिया थेट कल्पना व प्रतापला तुम्ही खरंच खूप मोठी चूक केली असल्याचं सांगते. सायलीवर विश्वास ठेवलात खरा पण तो नेमका खोटा आहे कारण मी पुरावाच तसा आणला आहे, असेही प्रिया पुढे सांगते. एवढ्यावरच न थांबता प्रिया वाटेल तसे आरोप करत नुसती बरळत सुटते. तेवढ्यात पूर्णा आई उठते आणि प्रियाला तू काहीही कागद दाखवशील आणि ते खपवून घेतले जातील असं तुला वाटतं का? आणि मी इतकी अशिक्षित वाटते का तुला? असं दरडावून विचारते. (Tharal Tar Mag Serial Update)
चैतन्य व अश्विनसुद्धा ही परिस्थिती पाहून प्रचंड टेन्शनमध्ये येतात. इतक्यात पूर्णा आई प्रियाच्या कानाखाली मारतात. पूर्णा आई यावर म्हणतात, जाब अर्जुन-सायलीला नाही तर तुला विचारावा लागेल, असं प्रियाला पुढे सांगतात. स्वतःच आधी नीट फाईल बघ असंही प्रियाला पूर्णा आई सांगताच प्रिया फाईल चेक करते तेव्हा त्यात राजेश साळवी खून प्रकरणाचे कागदपत्र तिला दिसतात. ते पाहून प्रिया आणखीनच चक्रावून जाते. अश्विनसुद्धा प्रियाला स्पष्ट शब्दात झापतो. अर्जुन सायलीला खोटं बोलून मुद्दाम त्रास देतेस असं म्हणत कल्पनासुद्धा रागावते. प्रताप पूर्णा आईला म्हणतो, आज मारले ते आधीच मारायला हवे होते, असं सांगतो. दोन दिवसांपूर्वी ही फाईल माझ्या ऑफिसमध्ये होती ती तुझ्याकडे अचानक येण्यामागचे कारण म्हणजे तू चोरी केली की काय?, असं स्पष्ट अर्जुन प्रियाला विचारतो.
पुढे कल्पना लगेचच रविराजला फोन करुन इथे घरी येऊन प्रियाने तमाशा केला असल्याचं कळवते. रविराज आश्चर्यचकित होतो की ती तिथे कशी?. त्यानंतर रविराज तडक अर्जुनच्या घरी येतो आणि अर्जुन रविराजला तिने इथे येऊन काय केले ही सर्व हकीगत सांगतो. रविराजला तन्वीचा प्रचंड राग येतो. कल्पनासुद्धा रविराजला तन्वीबद्दल तक्रार करते. रविराज रागाच्या भरात तन्वीला घेऊन निघत असतानाच पूर्णा आई रागाच्या भरात वेडेपणा करत असल्याचे प्रियाला सुनावते. इतकेच नाही यावर शिक्षा म्हणजे यापुढे तू या घरात पाऊलसुद्धा ठेवायचे नाही, असेही पूर्णा आई प्रियाला सांगते.
चैतन्य अर्जुनला हे सर्व काय सुरु असल्याचे अर्जुनला विचारतो. अर्जुन पुढे तिच्या हाती खरीच फाईल लागली होती असं चैतन्यला सांगतो. मग खाली भलतीच फाईल कशी निघाली तिच्या हातात असे अर्जुनला चैतन्य विचारतो. मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, अर्जुन सायलीला मधुभाऊंची केस संपली की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सोडून खरंच लग्न करायची मनातली इच्छा बोलून दाखवयचा प्रयत्न करतो.