झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेले काही दिवस मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका बनत चालली आहे. या मालिकेचे कथानक त्रिनयना व विरोचक यांच्यातील युद्धावर आधारित आहे. त्यामुळे मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे व खिळवून ठेवणाऱ्या कथानकामुळे ही मालिका बघण्याचा प्रेक्षकांचा कल वाढत आहे. अशातच मालिकेत नेत्राने अस्तिकाचा अंत केला असल्याचे पाहायला मिळाले.
अस्तिकानंतर नेत्राने विरोचकाचादेखील वध केला. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका प्रोमोमध्ये विरोचक अद्वैतचा गळा पकडत त्याला मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी नेत्रा विरोचकाचा वध करते. मात्र, यामुळे विरोचकाचा अंत होत नाही. यानंतर विरोचक पुन्हा जीवंत होते आणि तिला दक्षिण दिशेकडे कुणीतरी बोलवतानाचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ती दक्षिण दिशेकडे तिला बोलवणाऱ्या व्यक्तीच्या शोधात निघाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
अशातच आता या मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये विरोचकाचा वध करणे हेच नेत्राचे अंतिम ध्येय असल्याचे म्हटले आहे. यामध्ये नेत्रा-अद्वैत एकमेकांशी विरोचकाविषयी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. यतावेळी नेत्रा अद्वैतला असं म्हणते की, “आता विरोचकाला मारल्याशिवाय मी अजिबात स्वस्त बसणार नाही. विरोचकाचा वध केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. यावर अद्वैतही तिला “विरोचक आता एकटा पडला असून तिच्यावर हल्ला करण्याची हीच योग्य वेळ आहे” असं तो म्हणतो.
आणखी वाचा – नीना गुप्ता होणार आजी, वयाच्या ३४ व्या वर्षी लेक मसाबा गरोदर, अभिनेत्री म्हणाली, “मुलांचे मूल…”
यापुढे मग पुन्हा नेत्रा त्याला असं म्हणते की, “विरोचकाकडे आता अस्तिका नाही पण तरी तिच्याकडे एक शक्ती आहे आणि आपल्याला त्या शक्तीविरुद्ध लढायचं आहे. अस्तिका गेल्यामुळे विरोचक आता काहीतरी मोठं घडवून आणणार आहे. त्यामुळे आता आपण तयार राहायला पाहिजे” असं म्हणते. त्यामुळे विरोचक आता काय घडवून आणणार? आणि नेत्रा-अद्वैत या विरोचकाच्या शक्तीविरुद्ध कसे लढणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक आगामी भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत.