‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. या मालिकेत पारू व अहिल्यादेवी यांचा बंध फुलताना दिसत आहे. पारू व अहिल्यादेवी यांच्यावर या मालिकेचं कथानक फिरतांना दिसत आहे. सध्या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या पारूचा ब्रँड एम्बेसेडर होण्याचा प्रवास पाहायला मिळत आहे, मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. (Paaru Serial Promo)
सध्या मालिकेत दिशा व प्रीतमचा साखरपुडा समारंभ होताना पाहायला मिळत आहे. दिशा व प्रीतमच्या साखरपुड्यासाठी किर्लोस्कर मेन्शनमध्ये सर्व जमलेले असतात. सुरुवातील प्रीतम यासाठी तयार नसतो मात्र अहिल्यादेवींच्या शब्दाखातर तो तयार होतो. त्यानंतर मालिकेत दिशा सर्वांसमोर प्रीतमला खोटी प्रेमाची कबुली देते. प्रीतमला दिशाच हे नाटक माहित असतं. त्यामुळे तो जास्त असं तेव्हा काहीच बोलत नाही.
तर एकीकडे दामिनीने साखरपुड्याच्या अंगठीची जबाबदारी ही पारूवर सोपवलेली असते. पारूकडून मात्र ती अंगठी हरवते. आणि ती अंगठी दामिनीनेचं चोरून तिच्या कपाटात लपवलेली असते. आता साखरपुड्यावेळी ही अंगठी पारू शोधणार का हे अद्याप समोर आलेलं नाही. अशातच मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेच्या या प्रोमोमध्ये दिशा चक्क पारूची माफी मागताना दिसत आहे.
दिशा व प्रीतम यांचा साखरपुडा होणार असतो. दोघंही एकमेकांना अंगठी घालणार असतात. सगळेचजण दोघांच्या या साखरपुड्यासाठी खूप उत्सुक असतात. एकमेकांना अंगठी घालणार इतक्यात अहिल्यादेवी थांबवतात. आणि दिशाला बोलतात, दिशा आधी तू पारूची माफी माग. यावर दिशा असं बोलताना दिसत आहे की, “पारू मला माफ कर. मी तुझा अपमान केला. तुला नको नको ते बोलले”, असं सर्वांसमोर बोलते. हे ऐकून पारूला धक्का बसतो. आता अहिल्यादेवींनी दिशाला पारूची का माफी मागायला लावली असेल याची उत्सुकता लागून राहिली आहे.