रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोजून चपाती बनवल्यामुळे नुकसान होण्याची भीती, ज्योतिष शास्त्र काय सांगतं?, ‘हे’ पाच नियम फॉलो करता का?

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 19, 2024 | 5:34 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
vastu tips

चपात्या मोजून बनवण्यामागील शास्त्र काय आहे?

घरामध्ये स्वयंपाक करताना किती चपाती खाणार? असा प्रश्न हमखास विचारला जातो. सगळ्यांनी आपापला आकडा सांगितल्यानंतरच त्याप्रमाणे चपात्या बनवल्या जातात. जास्त चपात्या झाल्या तर त्या वाया जाऊ नयेत हे त्यामागील एक कारण असते. मात्र अशा चपात्या मोजून बनवू नयेत असे अनेकदा शास्त्र सांगते. यामुळे तुमच्या घरात आर्थिक अस्थिरता येते असं म्हंटलं जातं. आता आपण वास्तुशी असलेले नियम आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तसेच या सगळ्या सर्व गोष्टीमागे काय तथ्य असतं यामागील आपण वास्तव जाणून घेऊया. (vastu tips)

शास्त्रानुसार, चपाती बनवणे सूर्य, मंगळ, राहू ग्रह यांच्याशी संबंधित आहे. चपात्या मोजून सूर्य व मंगळ ग्रह कमजोर होतात. तसेच राहूचा नकारात्मक प्रभाव आयुष्यावर पडू शकतो. हे परिणाम होऊ नये यासाठी चपात्या बनवताना कधीही न मोजण्याचा सल्ला दिला जातो. तसेच चपाती बनवताना तुमचे तोंड पूर्व दिशेला असावे. त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला गॅस असू नये. या दिशेला बघून चपाती बनवणं शुभ मानले जात नाही.

आणखी वाचा – रिया सेनच्या वडिलांचे निधन, वयाच्या ८३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही व्यक्त केलं दुःख

त्याचप्रमाणे पहिली चपाती बनवल्यानंतर ती सगळ्यात आधी गाईला खायला घाला. गाईला चपाती खायला घातल्यास तुम्हाला पुण्य लागते. तसेच तुमचे मन शांत राहते आणि घरगुती वाददेखील टळतात. हिंदु धर्मामध्ये प्राणीमात्रांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही गाईबरोबर कुत्र्याला चपाती खायला घाला. श्वानाला चपाती खायला दिल्याने पुण्य मिळते. श्वानाला चपाती खायला घातल्यास राहू, केतू व शनि ग्रहांची शांती होते.

आणखी वाचा – Video : “समृद्धी घर रिकामं होतंय”, ‘आई कुठे…’चा सेट रिकामा होताना पाहून कलाकार भावुक, व्हिडीओ व्हायरल

त्याचप्रमाणे एकादशीला तांदूळ खाणे वर्ज्य मानले जाते. शरद पौर्णिमा, शीतलाष्टमी, नागपंचमी व घरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास चपाती बनवली जात नाही. असे करणे अशुभ मानले जाते. जर एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर चपाती बनवली तर ते आरोग्यासाठी नुकसानदायक असते. तसेच मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळत नाही असेही म्हंटले जाते.       

Tags: rotiroti making vastuVastu Tips
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Sashank Ketkar On Mens Day

"ओझ्यानं कितीही थकला तरी…", पुरुष दिनानिमित्त शशांक केतकरची कविता, म्हणाला, "धीरानं लढणाऱ्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.