‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, प्रियानं सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सुभेदारांसमोर आणलेलं असतं. मात्र सायली देवासमोर हात ठेवून शपथ घेत सांगते की, माझं अर्जुन ₹वर भरपूर प्रेम आहे आणि आयुष्यभर राहील. हे ऐकल्यावर पूर्णा आजी खात्री पटवून घेण्यासाठी प्रियाच्या म्हणण्यानुसार चैतन्यला फोन करते आणि विचारते की, सायली व अर्जुनच खरंच लग्न झालं आहे का?, यावर चैतन्य हो असं सांगतो. तेव्हा पूर्णा आजी प्रिया व अस्मिताची शाळा घेते आणि सांगते की, तुम्ही माझ्या नातवाबद्दल उगीच काहीतरी माझ्या मनात भरवू नका आणि सायलीबद्दल तुमच्या मनात राग आहे मला माहिती आहे पण तुम्ही अशी कटकारस्थान पुन्हा केली तर मी तुम्हाला पुन्हा माफ करणार नाही. (Tharal Tar Mag Serial Update)
हे तुम्हाला मी शेवटचा माफ करते असं सांगून प्रिया व अस्मिताला तिथून जायला सांगतात. त्यानंतर इकडे अर्जुन सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो मात्र सायलीचं लक्ष नसतं त्यानंतर अर्जुन कामावर जायला बाहेर पडतो तेव्हा अर्जुन सिम कार्ड बदलतो आणि दुसऱ्या नवीन सिम कार्डवरून चैतन्यला फोन करतो आणि म्हणतो की, मला तुझ्याशी बोलायचं आहे इकडे माझ्या इथे माझ्या प्रेमाचा गोंधळ झालेला आहे. पूर्णा आजींनी सायलीला शपथ घ्यायला लावलेली असते त्यामुळे सायलीने सुद्धा प्रेमाची खरी शपथ घेतली आहे पण हे सगळं पूर्णा आजीपर्यंत गेलेच कसं?, यावर चैतन्य सांगतो की, मी तुला सर्व काही भेटून सांगतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तिथे साक्षी असणार आहे त्यामुळे अर्जुन जास्त काही बोलत नाही आणि ते भेटायचं ठरवतात. तर इकडे कल्पना म्हणते की, पूर्णा आईने उगीचच तुमच्यावर अतिरेक केला तेव्हा अस्मिता तिला सांगते की, यांनी तुझ्या डोळ्यावर पडदा घातला आहे पण आमचे डोळे उघडे आहेत.
तेव्हा कल्पना सांगते की, त्यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे आम्हाला सर्वांनाच पाहायला मिळतं. खऱ्या संकटाच्या वेळी जे एकमेकांच्या मदतीला धावतात त्याचं ते अगदी हुबेहूब उदाहरण आहेत आणि यालाच खर प्रेम असं म्हणतात. सायलीला खऱ्या प्रेमाची जाणीव होते आणि ती खूपच खुश असते आणि ती रूम मध्ये जाऊन अर्जुनच्या फोटोला मिठीत घेते आणि ती खूप आनंदी असलेली पाहायला मिळते. त्यानंतर मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, चैतन्य अर्जुनला जाऊन सर्व काही सांगतो की, मी रागाच्या भरात साक्षीला तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल जाऊन सगळं काही सांगितलं हे ऐकल्यावर अर्जुनचा पारा चढतो तर अर्जुन म्हणतो की, आपल्यात भांडण होती पण आपली मैत्री तरी खरी होती ना?, यावर कुणाल रडत म्हणतो, मी इतक्या चुका केल्या आहेत की, मला सुद्धा वाटतं कुणाल सारखं…एवढं बोलताचं अर्जुन चैतन्यच्या कानाखाली मारतो.
तर इकडे साक्षी प्रियाला सांगत असते की, चैतन्यनेच मला हे सत्य सांगितलं की, अर्जुन व सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे आणि हेच सत्य आहे. तर इकडे सायली कल्पनाला घेऊन नाचत असते आणि सांगते की, मी आज खूप खुश आहे. मला खूप आनंद झाला आहे. याआधी मला इतकं चांगलं कधीच वाटलं नव्हतं. आता चैतन्य व अर्जुन मिळून हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांपासून कसं लपवून ठेवणार?, साक्षी या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा पाठलाग करत नेमकं काय आहे ते जाणून घेणार का?, हे सर्व पाहणे मालिकेत रंजक ठरेल.