‘पारू’ या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळतं आहे की, अहिल्यादेवींनी पारुला शिक्षा सुनावलेली असते की आठ दिवस तू किर्लोस्कर वाड्यात पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. तर दामिनीला शिक्षा सुनावलेली असते की, जेवढे दिवस पारू इथे नाही आहे तेवढे दिवस पारूची सर्व काम करायची हे ऐकून दामिनीचा पारा चढलेला असतो. त्यानंतर दामिनी सकाळी उठते आणि कॉफी दिली नाही म्हणून किचनमध्ये तावा तावात जात सावित्रीला जाब विचारते. तेव्हा सावित्री सांगते की, अहिल्या मॅडमने तुम्हाला कॉफी घेऊन बोलावलं आहे हे ऐकल्यावर तर दामिनीचा अजूनच संताप होतो. (Paaru Serial Update)
त्यानंतर दामिनी म्हणते दे कॉफी मी नेऊन देते. तेव्हा सावित्री तिला नोकरांनी नेसायची साडी देते आणि सांगते की, ही साडी नेसूनच तुम्हाला आजपासून आठ दिवस काम करायचं आहे. हे ऐकल्यावर दामिनी म्हणते की, तू मला ऑर्डर सोडू नकोस आणि आता तुझे दिवस चांगले आहेत उद्या माझे चांगले येतील तेव्हा मी तुला बघूनच घेईल असं म्हणत साडी घेऊन जाते. त्यानंतर इकडे अहिल्यादेवी, प्रीतम, त्याचा काका, त्याचे बाबा सगळेजण बसलेले असतात. तेव्हा दामिनी अहिल्यादेवींना नोकरांची साडी नेसून कॉफी घेऊन येते आणि म्हणते की, मॅडम कॉफी आणली आहे. तेव्हा त्या कॉफी बाजूला ठेवायला सांगतात. दामिनीचं हे रूप पाहून तिच्या नवऱ्याला आणि प्रीतमला भरपूर हसू येत तर अहिल्यादेवींना सुद्धा हसायला येतं. तितक्यात दामिनीचा धक्का दिशाला लागतो पण दिशा दामिनीला ओळखतच नाही.
त्यामुळे दिशा दामिनीला ओरडते, तेव्हा दामिनी रागारागात तिथून निघून जाते. त्यानंतर दिशाही तिच्या मागोमाग जाते आणि सांगते की, तुझ्यावर ही वेळ माझ्यामुळे नाही तर पारूमुळे आलेली आहे. असं म्हणत पारूबद्दल दिशा दामिनीच्या मनात राग निर्माण करते. तर इकडे मारुती पारू बरोबर बोलायला जातो. पारूला तो अहिल्यादेवीने तिच्यासाठी मुलाची निवड केली असल्याचे सांगतो आणि मग तो हरीशबद्दल सांगतो. हे ऐकून पारू शांतच बसते आणि पारू शेवटी रडू लागते आणि म्हणते की, तुला मी एवढी जड झाली आहे का?, आधी इतकी वर्ष मी तुझ्यापासून लांब राहिले आणि आता मला तुझ्या जवळ राहायचे आहे तर तू मला दूर करत आहेस.
मला माझ्या आईची सेवा करता नाही आली आता तरी मला तुझी आणि देवी आईची सेवा करायला मिळू दे. आता हा लग्नाचा विषय थोडे दिवस तरी नको असं म्हणत पारू लग्नाला नकार देते. आता मालिकेत दामिनी पारू विरुद्ध कोणता नवा डाव आखणार नाही ना?, पारूने लग्नाला दिलेला नकार अहिल्यादेवीपर्यंत पोहोचल्यावर अहिल्यादेवी यावर काय बोलणार हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.