‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की,अर्जुन केससाठी कोर्टात जात असतो. त्यावेळी कोर्टात केस हरल्याने नाराज झालेल्या अर्जुनला सायली समजावायचा प्रयत्न करते. पण अर्जुन त्याच्या हातून वकिलीची सनद जाण्याची चिंता व्यक्त करतो. त्यामुळे मधुभाऊंसह कुठलीही केस लढू शकणार नसल्याने सायली सोडून जाण्याची भीतीही अर्जुन सायलीकडे व्यक्त करतो. दुसरीकडे प्रिया व नागराज मुद्दाम रविराजकडे येऊन अर्जुनचा पुढचा प्लॅन जाणून घेण्याचा खूप प्रयत्न करतात. (Tharal Tar Mag Serial Update)
त्यावेळी रविराजला एका वकिलाचा फोन आल्याने तो फोनवर बोलत तिथून निघून जातो. त्यामुळे प्लॅन न कळल्याने रविराज प्रिया दोघेही नाराज होतात. इथे अर्जुन खूप हताश असताना सायली अर्जुनच्या चेहऱ्यावर हसू तर आणतेच शिवाय त्याच्या कॉलेजची आठवणी जपत अगदी त्याला हवी तशीच कॉफी देते. दुसरीकडे महीपत पवार वकिलला साक्षीच्या विरोधातले पुरावेही खोटे सिद्ध करत आश्रम केस बंद करण्याची धमकी देतो.
एकीकडे बार कौन्सील मेंबर अर्जुन व चैतन्यवर आरोपांचा वाटेल तसा भडीमार करतात. ते प्रश्न ऐकून अर्जुन व चैतन्यला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुनला यामुळे खूप राग येतो पण रविराज अर्जुनला शांत बसायला सांगतो. शिवाय रविराज चैतन्य व अर्जुनची बाजू मांडत त्यांच्या आजवरच्या कामाकडे पाहून मगच योग्य निर्णय घेण्याची विनंती बार कौन्सीलकडे करतो. बार कौन्सीलकडून त्यांना हा निर्णय घ्यायला अजून वेळ हवा असून उद्या निर्णय कळवला जाण्याचे अर्जुनला सांगण्यात येते. कल्पना घरी अत्यंत अस्वस्थ होऊन देवीआईला प्रार्थना करते, सायली कल्पनाला धीर देत देवी आईला साकडे घालते.
मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, चैतन्य बोलता बोलता अचानक गायब होतो. महीपतने त्याला काही केले असल्याची शंका रविराज अर्जुनला बोलून दाखवतो. घरी आल्यावर न्यूजमध्ये चैतन्य प्रेस कॉन्फरेन्स घेत अर्जुनचा केसशी काहीही संबंध नसून सर्वस्वी त्याला आपणच जबाबदार असल्याची कबुली देतो.