‘ठरलं तर मग’ मालिकेच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, पूर्णा आई ऑफिसबद्दल विचारताच अर्जुन व चैतन्य ऑफिसमध्ये घडलेला सर्व प्रकार सांगतात. तेव्हा सायली रविराज किल्लेदार ऑफिसला आल्याने मोठा धीर मिळाला असंही सांगते. दुसरीकडे रविराज नागराज व प्रियाला म्हणजेच तन्वीला अर्जुनच्या ऑफिसला जाऊन सपोर्ट केल्याचे सांगतो. याशिवाय साक्षीने खोटी नाटकं करुन चैतन्यला फसवून आणि अर्जुन चैतन्यविरोधात प्रेस कॉन्फरेन्स घेऊन खोटे आरोप केल्याने त्या दोघांच्या पाठीशी जास्त खंबीर होऊन उभे राहणार असल्याचे सांगतात. (Tharal Tar Mag Serial Update)
चैतन्य व माझ्यावर बार कॉन्सिल बसवून त्यांना उत्तर द्यावे लागणार असल्याचं अर्जुन सांगतो. बार कॉन्सिलमुळे अर्जुन- चैतन्य मोठ्या अडचणीत सापडतील का?, असं रविराजला नागराज विचारतो. त्यावर रविराज शक्यता नाकारता येत नसून, मी मात्र त्यामुळे अर्जुन चैतन्यमागे जास्त खंबीरपणे उभे राहून त्यांच्या बाजूने लढायचे सांगतो. नागराज व प्रिया हे ऐकून पुन्हा चिंतेत पडतात. या सगळ्यासाठी अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल उपाय असून ती शोधून काढण्याबद्दल प्रिया नागराजला सांगते. इथे अर्जुनच्या घरी चैतन्य स्वतःला एकदमच कमी लेखू लागतो. पण त्याला कल्पना व पूर्णा आई सज्जड दम भरतात.
चैतन्यचे दुःख मी जास्त समजू शकते, असं सायली म्हणते. पण अर्जुन मनातल्या मनात आपण कायम सायलीबरोबर असल्याचे म्हणतो. कल्पना, विमल व सायली वट पौर्णिमेची तयारी करतात. अर्जुनही सायलीसाठी उपवास करायचे ठरवतो. सायली देवी आईकडेही प्रार्थना करते. दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेसाठी तयार होते.
मालिकेच्या पुढील भागात पाहणार आहोत की, सायली कल्पना व अस्मिताबरोबर वटपौर्णिमेच्या पूजेला निघते. आता मालिकेत सायलीची वटपौर्णिमेची पूजा कोणतेही अडथळे न येता पार पडणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार.