‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, मधुभाऊंच्या केससाठी सायली-अर्जुन सगळेच प्रयत्न करत असतात. तर चैतन्यच्या मदतीने अर्जुनला साक्षी विरोधात पुरावे सापडतात. चैतन्य साक्षीकडे केवळ या केससाठीच्या फायदयासाठी राहत असते. तर साक्षीही त्याच्याकडे फायद्यासाठी असते मात्र हे सत्य चैतन्य ओळखुन असतो. साक्षीला कोर्टाकडून कोर्टात हजर राहण्याची नोटीस येते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. (Tharal Tar Mag New Promo)
चैतन्य साक्षीला शांतही राहण्यास सांगतो. तर इकडे सायली व अर्जुन आश्रम केसमधील शिवानी जाधवची भेट घेतात. त्यावेळी शिवानी सगळं खरं कबूल करते आणि कोर्टातही ती खरं सांगणार असल्याबाबत सांगते. तेव्हा शिवानीच्या जीवाला साक्षीकडून काही धोका निर्माण होऊ नये म्हणून सायली व अर्जुन शिवानीला सुभेदाराच्या घरी घेऊन येतात. आणि सालीची मैत्रीण असल्याचं खोटं सांगून शिवानीची राहण्याची परवानगी मागतात. शिवानीही राहायला तयार होते आणि घरचेही परवानगी देतात.
त्यानंतर आता मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, कोर्टात केस सुरु असते. तेव्हा अर्जुन शिवानीला “जे काही घडलं होतं ते खरं खरं सर्व कोर्टाला सांग”, असं सांगतो. यावर शिवानी म्हणते, “मी साक्षी मॅडमच्या बाजूने जी काही साक्ष दिली होती ती पूर्णपणे खोटी होती. मला साक्षी मॅडमने खोटी साक्ष देण्यासाठी पैसे दिले होते”. यावर अर्जुन कोर्टाला सांगतो, “याचाच अर्थ मिस.साक्षी शिखरे यांनीच विलासचा खून केला आहे हे नाकारता येत नाही”.
अखेर पुराव्यानिशी अर्जुन व सायलीने साक्षीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणलेला असतो. आता साक्षी यावर काय उत्तर देणार?, साक्षी नवा डाव आखत या केसमधून सुटायचा प्रयत्न करणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.